पिंपरी-चिंचवड

पुणे, मुंबईतील एवढ्या आयटीयन्सच्या वाचल्या नोकऱ्या...वाचा...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : लॉकडाउनमुळे आपल्याकडील व्यवसाय आणि कामाचे प्रमाण कमी झाल्याचे कारण पुढे केल्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोक्‍यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार असतानाच, दुसरीकडे या कर्मचाऱ्यांना नोकरीपासून वंचित व्हावे लागू नये, म्हणून कामगार मंत्रालयातील अधिकारी थेट आयटी कंपनी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करू लागले आहेत. त्यामुळे पुण्या-मुंबईतल्या आयटी कंपन्यांमधील 300 जणांच्या नोकऱ्या वाचल्या असल्याचे राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान समितीचे सदस्य पवनजित माने यांनी सांगितले. 

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून आयटी कंपन्यांची कार्यालये बंद आहेत. दरम्यानच्या काळात काही कंपन्यांनी आपल्याकडे पुरेशा प्रमाणात काम नाही, त्यामुळे मनुष्यबळ कमी करावे लागू शकते, अशी सूचना कर्मचाऱ्यांना केली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. काही कर्मचाऱ्यांनी पुढे येत यासंदर्भातील कैफियत कामगार आयुक्‍तांकडे मांडत यामध्ये तत्काळ लक्ष घालून यावर मार्ग काढण्याची विनंती केली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे आलेल्या तक्रारींची योग्य ती दखल घेत कामगार मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी संबधित कंपन्यांच्या व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली. सध्या लॉकडाउनमुळे असणाऱ्या परिस्थितीची कल्पना देत कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे प्रकार तूर्तात थांबवण्यास सांगितले. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या निर्णयामध्ये बदल करत कर्मचाऱ्यांना कमी करणे, पगार न देणे असे निर्णय तूर्तात मागे घेतल्याचे माने यांनी सांगितले. 


कर्मचाऱ्यांनी कैफियत मांडल्यामुळे निघाला मार्ग 

दरम्यान, आयटी कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत कामगार आयुक्‍त कार्यालयामधे आपली कैफियत मांडल्यामुळे यामध्ये मार्ग निघाला आहे. कामगार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आयटी कंपन्याच्या व्यवस्थापनाबरोबर केलेल्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे हा तिढा सुटण्यास मदत झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT