पिंपरी-चिंचवड

VIDEO : पिंपळे सौदागरमधील विराज जगताप हत्या प्रकरणाबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : विराज जगताप याची प्रेमकरणातून हत्या करण्यात आली आहे. त्या प्रकरणाला जातीयतेचा वास आहेच, यात दुमत नाहीत. परंतु, सोशल मीडियावर एकमेंकावर वाईट पद्धतीने लिहिण्यात येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला महिलांचा आदर करायला शिकवलेले आहे. त्यामुळे हा संदेश आपल्याला पाळलाच पाहिजे. मानलाच पाहीजे. त्यामुळे सोशल मीडियावर खोडसाळपणे तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हिडिओ फोटो त्वरीत थांबवाव्यात. परिस्थिती बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे.

पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या बौद्ध तरुणाची रविवारी रात्री (ता. 7) निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याचे पडसाद राजकीय पटलावरदेखील उमटले आहेत. शनिवारी (ता.13) केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जगताप यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन "विराजची हत्या ही घटना अंत्यत गंभीर असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच संबंधित घटनेतील तरुणीला सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरीकडे आरोपींच्या कुटुंबाबाबत आक्षेपार्ह पोस्ट तयार करून त्या व्हायरल केल्या जात आहेत. त्या व्हिडीओत संबंधित मुलीचा व तिच्या आईचाही फोटो वापरण्यात आला आहे. या पोस्टमधून एकमेंकावर खोडसाळपणे, हेतूपुरस्कर लिहिण्यात येत आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीच हाताबाहेर जाईल. पोस्टमधून महिलांचा अपमान करू नये, म्हणून त्वरीत या पोस्ट थांबविण्याचे आवाहन ऍड. आंबेडकर यांनी केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT