पिंपरी-चिंचवड

Video : आयटी पार्कमधील नाले सफाईची ही आहे सद्य:स्थिती; यंदाही आयटीयन्सचे...

सुधीर साबळे

पिंपरी : गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे साठलेल्या पाण्यात अडकून पडलेल्या आयटीयन्सना घरी पोहोचण्यासाठी सहा ते आठ तासांचा अवधी लागला होता. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे आयटी कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत असले, तरी लॉकडाउन आता शिथिल होऊ लागल्यामुळे कंपन्यांचे कामकाज सुरु होऊ लागले आहे. आता पावसाला देखील सुरुवात झाली आहे. त्यामध्ये आयटी पार्क परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही, या परिसरातील नाल्यांची सफाई देखील झालेली नसल्याने यंदाच्या मान्सून मोसमात आयटी पार्कमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार होणार असल्याचे वास्तव 'सकाळ'ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. 

सद्यस्थिती ही आहे...

आयटी पार्कमधील फेज तीन, दोनमधील कंपन्यांच्या लगतच्या परिसरातून अनेक नाले गेले आहेत. मात्र, हे सर्व नाले अस्वच्छ अवस्थेतच आहेत. फेज तीनमध्ये अनेक रहिवासी सोसायट्या आहेत. आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अनेकजण तिथे राहतात. सोसायट्यांच्या लगतच्या जागेतून गेलेल्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, कचरा, दारुच्या बाटल्या, वाळलेली झाडे पडली आहेत. त्यामुळे मोठा पाऊस झाला तर याठिकाणी पाणी तुंबून ते थेट रस्तावर येउ शकते. याखेरीज हे पाणी रहिवासी सोसायट्या, कंपन्यांच्या आवारात घुसण्याची देखील शक्‍यता आहे. आयटी पार्कमधील फेज तीनच्या लगतच्या परिसरात डोंगर आहे, त्यामुळे तिथले पावसाचे पाणी थेट याठिकाणी येऊ शकते. काही ठिकाणी पाणी जाण्यासाठी चर खोदून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असली तरी जोरदार पाउस झाल्यास त्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे वाकड भागातील सेवा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे इथे अनेक जणांची वाहने बंद पडण्याचे प्रकार झाल्यामुळे वाहनचालकांना अडकून पडावे लागले होते. यंदा कोरोनाच्या संसर्ग असल्यामुळे आतापर्यंत आयटी पार्कमधील कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरु झालेल्या नाहीत, त्यामुळे सध्या या भागामध्ये होणारी वर्दळ कमी आहे. लॉकडाउन शिथिल होत असल्यामुळे येत्या एक-दोन महिन्यामध्ये या भागातील गर्दीत वाढ होण्याची शक्‍यता आहे, त्यामध्येच गेल्यावर्षी सारखा पाउस झाला तर आयटी कर्मचाऱ्यांना पुन्हा त्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे वाकड भागातील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आयटीयन्स म्हणतात... 

सध्या कोरोनामुळे आयटीयन्स वर्क फ्रॉम होम करत आहेत. लॉकडाउन शिथिल होत असल्यामुळे आयटी कंपन्यांचे कामकाज सुरु होऊ लागले आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये पुढल्या एक दोन महिन्यात आयटी कर्मचाऱ्यांची गर्दी वाढू शकते. मॉन्सूनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एमआयडीसी, ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन यांनी आयटी पार्कच्या परिसरात पावसाचे पाणी साठून वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी आत्ताच उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. गेल्यावर्षी इथे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अनेक तास वाहनचालकांना अडकून पडावे लागले होते, त्यादृष्टीने वेळीच योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्‍यकता असल्याचे अभय दांडेकर या अभियंत्याने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''ओबीसींचा कट-ऑफ बघा अन् EWSचा बघा...'', धनंजय मुंडे मराठा आरक्षणावर बोलले

Viral Video : सचिन तेंडुलकरचं विमान वादळात अडकलं, हिंसक प्राणी असलेल्या जंगलात करावी लागली एमर्जन्सी लँडिंग

Income Tax Notice: खबरदार! मित्रांचं बिल भरण्यासाठी तुमचं क्रेडिट कार्ड वापरताय? तर आयकर विभाग कारवाई करणार

Uttrakhand : पंतप्रधान मोदीचा उत्तराखंड दौरा; आपत्तीग्रस्तांसाठी जाहीर केली १२०० कोटींची मदत

Asia Cup 2025: गौतम गंभीर आल्यापासून हे असंच होतंय... Arshdeep Singh वर होणाऱ्या अन्याविरोधात R Ashwin ने उठवला आवाज

SCROLL FOR NEXT