पिंपरी-चिंचवड

Video :...म्हणून 'हा' व्यवसाय सुरू करावा लागला

आशा साळवी

पिंपरी : लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. परंतु, घरची चूल तर पेटवायची आहे. नुसतं बसून चालणार नसल्याने या संकटात उत्पन्न सुरू राहावे आणि कुटुंबाचा उदरर्निवाह व्हावा, म्हणून अनेकांनी आपला व्यवसाय बदलला आहे. अनेक छोटे हॉटेल, स्नॅक्‍स सेंटर, फुड स्टॉल, झेरॉक्‍स दुकान, ट्रॅव्हल्स, किराणामाल दुकानदारांनी नव्याने भाजीपाला व फळ विक्री सुरू केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

लॉकडाउनमुळे जीवनावश्‍यक वस्तू, किराणा दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत. दीड महिन्यापासून बहुतांशी जणांच्या हाताला काम राहिलेले नाही. अनेकांचे छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले असून, व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे. कोरोनाचे संकट पुन्हा किती दिवस राहणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. अनेकांचे सेव्हिंग किंवा मोठे भांडवल संपले आहे. 

पैसे कमवायचे, पोट भरायचे असेल; तर लॉकडाउनमध्ये फक्त भाजी व्यवसाय चांगला चालेल, असे लक्षात आल्यावर अनेकांनी भाजी विक्रीचा व्यवसाय थाटून संसार उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाज्यांबरोबर फळे विक्रीतही बेरोजगारांनी आघाडी घेतली आहे. भाजी विक्रीत फायदा असल्याने बेरोजगार एक ते दीड हजार रुपयांची भाजी खरेदी करून दिवसभर विक्री करतात. एक हजार रुपयांची भाजी विक्रीतून २०० ते ३०० रुपये सुटतात. त्यामुळेच की काय शहरात भाजीविक्री आणि फळे विक्रीची दुकाने वाढल्याचे दिसून येत आहे.

"सध्या भाजी विक्रीला मुभा आहे. या व्यवसायातून घर चालवण्यासाठी ते पुरेसे पैसे मिळू लागले आहेत. घरभाडे, औषधासाठी थोडीफार कमाई होत आहे."

- जगदेवी करचखेड, भाजी व्यावसायिक, अजमेरा कॉलनी, पिंपरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT