पिंपरी-चिंचवड

चार दिवसांपासून मावळात अंधार; पाणीपुरवठा योजना कोलमडली!      

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : चक्री वादळामुळे वडगाव उपविभागात विद्युत यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याने चार दिवसानंतरही सर्व गावांचा वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. वडगाव नगरपंचायतीच्या वतीने अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.  विजेअभावी पीठ गिरण्या व इतर उद्योग व्यवसायांवरही विपरीत परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दरम्यान, वडगावसह परिसरातील सर्व गावांचा वीज पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत होईल. परंतु, आंदर मावळातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास पाच-सहा दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

रविवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे वडगाव-नवलाख उंब्रे एमआयडीसी रस्त्यालगतचे आठ ते दहा विजेचे खांब पडल्यामुळे वडगाव (केशवनगर), कातवी, सांगवी आदी गावांसह आंदर मावळचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. हा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू असतानाच बुधवारी दिवसभर झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे वडगाव विभागात शंभराहून अधिक विजेचे खांब कोलमडून पडले. झाडे व जाहिरातीचे होर्डिंग पडल्याने वीज वाहक तारा तुटल्या. त्यामुळे वडगावसह परिसरातील आठ गावे व आंदर मावळातील सुमारे पस्तीस गावे व वाड्यावस्त्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वीज नसल्याने या सर्व गावांच्या पाणी योजनाही बंद पडल्या व नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली. वडगावमध्ये काही प्रभागात नळ योजनेचा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. नगरपंचायतीने तेथे टँकरची व्यवस्था केली होती. नागरिकांची तेथे झुंबड उडाली होती. विजेअभावी पीठ गिरण्या, पोल्ट्री फार्मस व इतर व्यवसायांवरही परिणाम झाला. विद्युत यंत्रणेचे नुकसान मोठे असल्याने चार दिवसांनंतरही सर्व गावांचा वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महावितरणने वादळ शांत होताच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पर्यायी व्यवस्थेद्वारे टप्प्याटप्प्याने एकेका भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत वडगावसह कातवी, साते, सांगवी, कान्हे, जांभूळ आदी गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून संध्याकाळपर्यंत परिसरातील सर्व गावांचा व पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महावितरणच्या वडगाव विभागाचे सहाय्यक अभियंता शाम दिवटे यांनी दिली. मात्र, दुर्गम अशा आंदर मावळात ७० ते ८० खांब पडल्याने तेथील वीज पुरवठा सुरळीत करण्यास पाच-सहा दिवसांचा कालावधी लागेल अशी माहिती त्यांनी दिली.                          

पाणीपुरवठा रविवारी सुरळीत होईल                                         

विजेअभावी पाणी योजना बंद पडल्याने संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नगरपंचायतीने तेथे टँकरने पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती. महावितरणने आता वडगाव परिसराचा वीजपुरवठा सुरळीत केल्याने रविवारी शहराचा पाणीपुरवठाही सुरळीत होईल, अशी माहिती नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी दिली.                    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT