पिंपरी-चिंचवड

पूर निवारण समिती पुन्हा आक्रमक

CD

महाड, ता. २५ (बातमीदार) : महाड येथील महापुराला दासगाव येथील कोकण रेल्वेचा पूल आणि भराव जबाबदार नाही, असा अहवाल देण्यात आला आहे. कोकण रेल्वे प्रशासन आणि आयआयटी यावर ठाम आहे. यानंतर महाड तालुक्यातील रहिवासी आणि पूर निवारण समितीने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला असून विविध प्रकारची आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या २२ जुलैला महाड येथे महापूर आला होता. यामध्ये कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली. त्यानंतर पूर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे महाडकर नागरिकांनी एकत्र येत पूर निवारण समिती स्थापन केली. कोकण रेल्वेने दासगाव येथे सावित्री नदीवर रेल्वेचा पूल बांधला असून या पुलामुळे व पुलाच्या भरावामुळे महाडमध्ये पाण्याची पातळी वाढत असल्याचा आरोप या समितीने केला. हा भराव काढून टाकून या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी समितीने केली होती. याबाबत लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठकाही झाल्या.

कोकण रेल्वेने याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मुंबई आयआयटीकडून अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे मान्य केले होते; परंतु आयआयटीने हा भराव पुरासाठी कारण ठरत नाही, असा निर्वाळा दिला आहे. तो पूर निवारण समितीने मान्य केला नाही. त्यानंतर मुंबई आयआयटी येथे २१ एप्रिलला समितीची बैठक झाली. बैठकीला कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता नागदत्त राव, आयआयटी मुंबईचे डॉ. कपिल गुप्ता, समितीचे संजीव मेहता, प्रकाश पोळ, नितीन पावले, रविशंकर वेर्णेकर, उल्का महाजन उपस्थित होते.
समितीकडून सदस्यांनी या अहवालाबाबत अनेक तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास करून मुद्दे संबंधितांकडे मांडले; परंतु य मुद्द्यांवर चर्चा न करताच कोकण रेल्वे व आयटी आपल्या अहवालावर ठाम राहिली आहे. त्यामुळे महाडकरांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनाची भूमिका घेण्याचे ठरविले आहे.
....
न्यायालयात दाद मागणार?
आयआटीच्या अहवालात पुराला कोकण रेल्वे पूल आणि भराव कारण ठरत नाही, असे नमूद करण्यात आले आहे. महाड पूर निवारण समितीला हे मान्य नाही. त्यामुळे यापुढेही रास्ता रोको, कोकण रेल्वे रोको, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, जनजागृती असे मार्ग अवलंबण्यात येणार आहेत. न्यायालयात दाद मागण्याच्या निर्णयावरही समिती विचारविनिमय करत आहे.
......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT