पिंपरी-चिंचवड

वीजप्रश्नी महाविकास आघाडी अपयशी

CD

तळेगाव दाभाडे, ता. २५ : वीज प्रश्नी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने वीज दरात पंचवीस टक्के केली. शिवाय भारनियमन करून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. सुरक्षित ठेवीच्या नावाखाली जनतेची लूट केली जात असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आघाडी सरकारवर केला.
भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भेगडे यांनी सरकारच्या उणिवांवर बोट ठेवले. विशेषतः भारनियमन करून नागरिकांची होणारी गैरसोय त्यांनी अधोरेखित केली. सरकार जाणीवपूर्वक भारनियमन करीत आहे. आघाडी सरकारने वीज निर्मितीचे कारखाने बंद पाडले आहे, याकडे लक्ष वेधले. केंद्र सरकारकडून वीज निर्मितीसाठी कोळसा पुरवठा केला. त्याचे थकीत बिल राज्य सरकार केंद्राला अद्याप देऊ शकले नाही. मावळ तालुक्यातील रेल्वेशी संबंधित असलेल्या प्रलंबित प्रश्नासाठी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेऊन, वडिवळे, वडगाव सांगवी, बेगडेवाडीतील भुयारी मार्गाच्या कामातील त्रुटी दूर केल्या जातील, असेही भेगडे यांनी सांगितले. मळवली, तळेगाव स्टेशन, पिंपरी-चिंचवड हद्दीतील रेल्वे स्टेशन लगतच्या बांधकामांना रेल्वे प्रशासनाने नोटीस दिल्या. त्या बांधकामावर लगेच कुठलाही कारवाई केली जाणार नसल्याचे दानवे यांनी सूचना दिल्या असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT