पिंपरी-चिंचवड

महापालिकेचे केवळ चौदा विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक

CD

पिंपरी, ता. ८ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी (ता. ७) जाहीर झाला. त्यात महापालिकेच्या शाळांमधून पाचवी आणि आठवीचे असे एकूण १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर एक महिना उलटूनही अंतिम निकाल प्रसिद्ध होत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर शुक्रवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात आली.
महापालिकेच्या शाळांमधील पाचवीच्या वर्गामधून ३ हजार ८१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार २०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ८६५ विद्यार्थी पात्र ठरले तर १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. पाचवीमधून महापालिकेच्या पिंपळे गुरव प्राथमिक शाळेमधून मृणाली प्रमोद सकपाळ या विद्यार्थिनीने ८८.६६ टक्‍के गुण प्राप्त करत मनपा शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर नैतिक रवी ठाकरे हिने ८३.३३ टक्‍के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
इयत्ता८ वी च्या वर्गांमधून ३ हजार १३९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले. त्यातून १ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी केवळ २ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. राहटणी येथील कन्या शाळा क्रमांक ५५ मधील संजना राजेंद्र मांगवडे हिने ७८ टक्‍के गुण मिळवीत महापालिका शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर मोशी कन्या प्राथमिक शाळेतील नंदिनी रमेश भालेकर हिने ७०.६६द्वितीय क्रमांक मिळविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT