देहू, ता.१९ : तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. यामुळे १२ गावांतील जमिनी बाधित होणार आहेत. त्यावर या १२ गावांतील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. याबाबत नुकतेच देहू येथे ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे सांगर्डी, बोडकेवाडी, झेंडेमळा, काळोखेमळा, तळवडे, निघोजे, कुरुळी ते पुढे लोणीकंदमार्गे उरुळी कांचन ही गावे बाधित होणार आहेत. त्यामुळे शेतकरी, घरे जाणार आहे. त्यातच ‘पीएमआरडीए’ने रिंग रोडचाही प्रस्ताव मांडला आहे. त्यातही जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. या परिसरांतील शेतकऱ्यांच्या भावना शासनाकडे पोचवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, ‘‘या प्रकल्पाचा मार्ग बदलावा,’’ अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मध्य रेल्वेचे पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनाही पत्र दिले आहे.
बाधित शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे : शेळके
याबाबत आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘‘या रेल्वे प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे. कारण, काहीजण सुरवातीला विरोध करतात. नंतर मागच्या दाराने मोबदला घेतात. त्यामुळे आंदोलन फसते. याचा अनुभव मी घेतला आहे. मी नाहक विरोध करतो, असा प्रचार सर्वत्र होतो. त्यामुळे बाधित होणारे आहेत, त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे,’ असे आवाहन आमदार शेळके यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.