पिंपरी-चिंचवड

जाधववाडी परिसरात दूषित पाणीपुरवठा

CD

जाधववाडी, ता. २९ ः जाधववाडी, शाहूनगर आणि राजे शिवाजीनगर परिसरात अनेक दिवसांपासून महापालिकेतर्फे गढूळ दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पोटदुखी, उलट्या-जुलाब यासारख्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या असून जलजन्य आजाराच्या साथीची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून जाधववाडी परिसराला दूषित पाणी पुरवठा होत आहे. सकाळच्या वेळी पिण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी मिळणारे पाणी अस्वच्छ मिळत आहे. त्याने अनेक नागरिकांना पोटाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांचा औषधांवर खर्च वाढला आहे. अनेक ठिकाणी पोटदुखी, उलट्या-जुलाब यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे लहान मुलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याखेरीज नागरिकांना विकतचे पाणी घेऊन प्यावे लागत आहे.
अशातच साथीचे रोग उत्पन्न झाल्यास कोण जबाबदार राहणार ? असाही प्रश्न नागरिक व्यक्त करत आहेत.
आम्ही महापालिकेला वेळेवर कर देऊन दूषित पाणी प्यायचे का ? रोज विकतचे पाणी प्यायचे; मग, महापालिकेला कर कशाचा द्यायचा ? असे संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

खर्च आवाक्याबाहेर
बाहेरून रोज विकत पाणी घेण्यासाठी एक कुटुंबाला रोज ८० ते १०० रुपये लागतात. त्यानुसार महिन्याला दोन ते तीन हजार रुपये खर्च पाण्यावर करावे लागतात. हा खर्च सामान्य नागरिकांना परवडणारा नाही.

जलशुद्धीकरणावर प्रश्नचिन्ह
महापालिका पाणी शुद्धीकरणावर मोठा खर्च करत असतानाही नागरिकांना अशुद्ध पाणी का मिळते ? महापालिकेच्या शुद्धीकरण प्रकल्पातून पाणी शुद्ध करूनही वितरणादरम्यान ते दूषित होत असेल; तर याचा अर्थ वितरण वाहिनी जुनी, खराब झाली आहे किंवा तिची नियमित देखभाल होत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांच्या मागण्या
- दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील पाण्याचे रासायनिक आणि जैविक नमुने घ्यावेत
- त्याचे अहवाल त्वरित सार्वजनिक करावेत
- दूषित पाणीपुरवठ्याचे कारण शोधून तत्काळ दुरुस्ती करावी
- सर्व टाक्या आणि वाहिन्यांची स्वच्छता करून तपासणी करावी
- पाणी कधी आणि का दूषित झाले ? दुरुस्तीसाठी किती वेळ लागेल, याची माहिती नागरिकांना द्यावी
- स्वच्छ पाण्याची तातडीने उपलब्धता करून द्यावी
- जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी


काही दिवसांपासून महापालिकेतर्फे गढूळ पाणी पुरवठा होत आहे. पाणी अतिशय घाण असल्याने ते प्यावेसे वाटत नाही.
आणि प्यायले; तर मळमळ होते. बाहेरून रोज विकतचे पाणी कसे परवडणार ? यापेक्षा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छ पाणी पुरवठा करावा.
- मनिषा शिंदे, गृहिणी, जाधववाडी

महापालिकेला कर भरून दूषित पाणी प्यायचे आणि दवाखान्यात जाऊन बिल भरायचे; नाहीतर विकत पाणी घ्यायचे हा निव्वळ नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे. प्रशासनाने त्वरित हा खेळ थांबवावा.
आणि नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा.
- धनंजय पवार, स्थानिक नागरिक

JDW25A00287

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Viral Video : पतीसोबत गरबा खेळताना अचानक कोसळली महिला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ

Pune News : ११६ कोटीची जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करा; अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Phulambri News : फुलंब्रीत तिहेरी मृत्यूच्या घटना! विद्युत शॉक, गळफास व विषारी औषधाने तिघांचा बळी

Latest Marathi News Live Update : पाचोर्‍यातील कृष्णापुरीत घर पडून १ ठार, २ जखमी

SCROLL FOR NEXT