निगडी ता.२ ः निगडी प्राधिकरण भागातील पेठ क्र.२७ येथील हॉटेल व साईधाम सोसायटी, ओम शांती इमारत तसेच त्या इमारती मागील वसाहतीतील नागरिकांना रस्त्यावरील भटक्या श्वानांचा त्रास खूप होत आहे. त्यामुळे त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
भटक्या श्वानांमुळे लहान मुले, महिला,ज्येष्ठ नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हे श्वान अचानक हल्ला करीत असल्याने ती धोकादायक झाली आहेत. या संबंधी महापालिकेत तक्रार दिली आहे. पण हे श्वान पकडून नेले जात नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने भटक्या श्वानांचे नियमित निर्बीजीकरण करून त्यांचा उपद्रव थांबवावा अशी मागणी नागरिकांनी केली.आहे.
स्थानिक नागरिक सुभाष माने म्हणाले, ‘‘प्राधिकरण भागात भटक्या श्वानांमुळे नागरिक विशेषतः लहान मुलांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यांची संख्या जास्त झाल्याने ती धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे वेळीच योग्य तो बंदोबस्त करण्याची गरज आहे. विशेषतः रात्रीच्यावेळी हे श्वान अचानक दुचाकींचा पाठलाग करतात. त्यातून अपघाताची भीती आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.