सोमाटणे, ता.९ ः नवीन उर्से टोल नाका रुंदीकरणासाठी सेवा रस्त्यालगतचा काही भाग खोदल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे. तेथे सुमारे साठ फूट खोल खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे, संरक्षक भिंत बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतच्या गावांच्या दळणवळणासाठी रस्ते विकास महामंडळाच्यावतीने माती, मुरमाचा सेवा रस्ता करण्यात आला होता. गेल्या अडीच दशकांपासून आजूबाजूच्या गावांसह शेतात जाणारे शेतकरी याच रस्त्याचा वापर करत आले आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे टोलनाक्यावर होणारी वाहतूक कोंडी आहे. ती सोडविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्यावतीने उर्से गावच्या हद्दीतच मुंबई बाजूकडे तीन किलोमीटर अंतरावर टोलनाक्याचे स्थलांतर करण्याचे काम चालू आहे. हा नवीन टोलनाका अठ्ठावीस मार्गिकांचा करण्यासाठी सेवा रस्त्यालगतचा भाग खोदण्यात आला आहे. त्यामुळे, सध्या येथे साठ फूट उंचीची धोकादायक दरी तयार झाली आहे. पावसाळ्यात डोंगर उतारावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे हा सेवा रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे, तेथे वाहन घसरून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ते विकास महामंडळाने पावसाळ्यापूर्वी तातडीने या धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी गुलाब घारे, कचरू पारखी, विलास दळवी, सुनील गुजर, संतोष केदारी आदींसह रस्त्यालगतच्या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
रस्ते विकास महामंडळाने आश्वासन दिल्यानुसार तातडीने सेवा रस्त्याच्या धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी. द्रुतगती मार्गाखालील मोऱ्यांची साफसफाई करावी.
- सुभाष धामणकर, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती.
PNE24U24962
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.