सोमाटणे, ता. २५ : सततच्या पावसामुळे आढले, मळवंडी, पुसाणे ही तीनही धरणे यंदा मे मध्येच पूर्ण क्षमतेने भरली. त्यानंतर हलक्या पावसाने या तीनही धरणांच्या सांडव्यातून सध्या वेगाने पाणी वाहत आहे. तर, कासारसाई धरणाची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे विसर्ग सुरू असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या दरवाज्यातून ६८० क्युसेकप्रमाणे विसर्ग सुरू करण्यात आला. या विसर्गामुळे नदीला पूर आला असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी. नदीपात्रात उतरू नये, नदीकिनारी जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. सध्या कासारसाई धरणात उपयुक्त पाणीसाठा १४ दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा १५.२६ दशलक्ष घनमीटर, ८६.७९ टक्के इतका नियंत्रित करण्यात आला आहे, अशी माहिती शाखा अभियंता अमर धायगुडे यांनी दिली.
कासारसाई : धरणातून सुरू असलेला विसर्ग.
PNE25V25979
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.