पिंपरी-चिंचवड

नवयुग श्रावणी काव्यस्पर्धा उत्साहात

CD

पिंपरी, ता. २२ ः नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्यातर्फे दत्तोपंत म्हसकर स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा पार पडली. स्पर्धेत त्रिंबक बिनीवाले यांनी प्रथम, वैभव धस यांनी द्वितीय, आय. के. शेख यांनी तृतीय तर देवेंद्र गावंडे आणि रेवती जोगदंड यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. मंगला पाटसकर व अनंत घोगले यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ही ३२ वी नवयुग श्रावणी काव्यस्पर्धा ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नवयुगचे राज अहेर, प्रा. तुकाराम पाटील, माधुरी ओक, संस्थेचे प्रदीप पवार, मिलिंद कुलकर्णी, आर. एस. कुमार, पी. के. पाटील यांची उपस्थिती होती. स्पर्धेत ७२ कवींनी कवितेचे सादरीकरण केले. विजेत्यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रशस्तिपत्र आणि शाल तर सहभागी कवींना प्रमाणपत्र देण्यात आले. जयश्री श्रीखंडे आणि संतोष गाढवे या ज्येष्ठ कवींनी परीक्षण केले. कवी अरुण कांबळे यांनी प्रातिनिधिक कविता सादर केली. सलीम शिकलगार, अनिकेत गुहे, नेहा कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर यांनी नियोजन केले. अरविंद वाडकर यांनी सूत्रसंचालन तर पी. बी. शिंदे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT