सोमाटणे, ता.१९ ः मुसळधार पावसामुळे कासारसाई, पवना धरणाचा विसर्ग वाढवला असून पवना कासारसाई नद्यांची पाणी पातळी वाढली. सोमवारी सकाळी मावळात संततधार पावसाला सुरवात झाली होती, मंगळवारी पहाटेपासून पावसाचा जोर आणखी वाढला. या पावसाने पवनमावळातील पूर्वीच शंभर टक्के भरलेले आढले, पुसाणे, मळवंडी धरणे ओव्हरफ्लो झाले. त्यांच्या सांडव्यातून वेगाने पाणी वाहत आहे. पाणी नियंत्रित करण्यासाठी कासारसाई धरणातून १४८० क्युसेक प्रमाणे पाणी सोडण्यात येत आहे. कासारसाई नदी सांगवडे गावाजवळ धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पवना धरणाच्या वीज प्रकल्पातून १४६० क्युसेक तर दरवाज्यावाटे १०४४० क्युसेक प्रमाणे विसर्ग सुरु करण्यात आला आहे. विसर्गामुळे पवनेला पूर आला असून गोडुंब्रे जुना पूल व साळुंब्रे साकव पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर आणखी वाढल्यास विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदीपात्राजवळ जाऊ नये. सुरक्षा बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
Smt19Sf1.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.