सोमाटणे, ता. २१ : गहुंजे गावासाठी पवना नदीवर नव्याने बांधलेला पूल वाहतुकीसाठी सुरू होण्याआधीच पाण्याखाली गेला आहे. अकरा कोटी रुपये खर्च करूनही नागरिकांची समस्या ‘जैसे थे’ राहणार असल्याचे चित्र आहे.
पवना धरणाचे काम जून १९७५ मध्ये पूर्ण झाले आणि त्यानंतर धरणात पाणीसाठा सुरू झाला. दरवर्षी पावसाळ्यात धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर साळुंब्रे आणि गहुंजे या दोन्ही गावांमधील संपर्क तुटत असे. ही समस्या सोडवण्यासाठी पवना नदीवर पूल बांधावा अशी मागणी स्थानिक नागरिक गेल्या पन्नास वर्षांपासून पाटबंधारे विभागाकडे करीत होते. अखेर, पाच दशकानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १० कोटी ९७ लाख १६ हजार रुपयांच्या आर्थिक सहकार्यामुळे दोन वर्षांपूर्वी पुलाचे काम सुरू झाले आणि मे २०२५ मध्ये ते पूर्ण झाले. स्थानिकांना आशा होती की यंदाच्या पावसाळ्यात पुलावरून दळणवळण सेवा सुरळीत होईल. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीला धरणातून पंधरा हजार क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग होताच पूल पूर्णतः पाण्याखाली गेला. त्यामुळे पूल असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार या दोन्ही गावच्या नागरिकांना भविष्यात कायमस्वरूपी अनुभवायला मिळणार आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
PNE25V41761
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.