पिंपरी-चिंचवड

लग्न सोहळ्याचा बदलतोय ट्रेंड

CD

पिंपरी, ता. ९ : शहरात तसेच ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत लग्नसोहळ्यांचे स्वरूप झपाट्याने बदलू लागले आहे. लग्नसोहळा म्हटले की, वरात आलीच, पूर्वी पारंपरिक पद्धतीने नवे दाम्पत्याची वरात काढली जायची. मात्र, नंतर वरातीत डीजेचा दणदणाट आला. रात्री उशिरापर्यंत वरात चालायची. डीजेमुळे लांबणाऱ्या वरातीमुळे लक्ष्मीच्या पावलांनी पहिल्यांदाच सासरी येणाऱ्या ‘लक्ष्मी’ला सासरच्या घरात पहिले पाऊल टाकायला अक्षरशः पहाट उजाडायची. मात्र, आता शहरासह परिसरातही वरात काढण्याची प्रथा जवळपास बंद झाली आहे. तिची जागा आधुनिक, आकर्षक आणि थीम-आधारित कार्यक्रमांनी घेतली आहे. संगीत कार्यक्रम, मेहंदी कार्यक्रमांसह इतर कार्यक्रमांवर भर दिला जात असल्याचे दिसून येते.
डीजे आणि नाचगाण्याने निघणाऱ्या वराती लग्नसोहळ्यातील मुख्य आकर्षण होत्या. परंतु, वारंवार होणारी वाहतूक कोंडी, डीजेच्या आवाजावर निर्बंध तसेच रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या गोंधळाविषयी स्थानिक नागरिकांच्या तक्रारी यामुळे वरात काढणे अनेकांसाठी डोकेदुखी ठरत होते. त्यामुळे अनेक कुटुंबांनी वरात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वरात निघाली पाहिजे ही पारंपरिक मानसिकता हळूहळू बदलत असून, शहरासह ग्रामीण भागातील जुन्या प्रथा मोडीत निघत असल्याचे स्पष्ट होत आहे.

वरातीचा खर्च इतर आकर्षक उपक्रमांकडे
वरात काढण्यासाठी डीजे, पथक, सजावट आणि विद्युत रोषणाई असलेली गाडी यासाठी येणारा खर्च कमी नसतो. हा खर्च वाचल्याने अनेक कुटुंबांनी त्याच बजेटमध्ये थीम-बेस्ड मंडप, संगीत कार्यक्रम, प्री-वेडिंग, वधू-वरांची ग्रँड एंट्री, ड्रोन शो, लाईटिंगसह व्हिज्युअल इफेक्ट्स अशा आधुनिक उपक्रमांना पसंती दिली आहे.

सांस्कृतिक बदलांची नवी दिशा
पारंपरिकतेपेक्षा आधुनिकतेवर भर देणारी तरुणाई आता लग्नसोहळ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यावर भर देत आहे. सोशल मीडियासाठी आकर्षक फोटो, व्हिडिओ, रील्स या संस्कृतीमुळे लग्नसोहळे अधिक ग्लॅमरस आणि स्टाइलिश झाले आहेत.
वधू-वरांचे प्रवेशद्वार, मंडप सजावट ही नवी ओळख बनत आहे.

मांडव टहाळ्याची क्रेझ
वरातीतील डीजेचा दणदणाट बंद झाला असला तरी आता मांडव टहाळा वाजत गाजत काढण्याची क्रेझ वाढत आहे. शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी डीजेच्या दणदणाटात मांडव टहाळा आयोजित केला जात असल्याचे दिसून येत आहे.

डीजेच्या दणदणाटात निघणारी रात्रीची वरात बंद झाली ही चांगली बाब आहे. लग्नानंतर लक्ष्मीच्या पावलाने घरी येणाऱ्या ‘लक्ष्मी’चे पारंपरिक पद्धतीने स्वागत व्हायला हवे. परंपरा जपायला हव्यात.
- मुरली जठार, नागरिक

लग्नात वरात नसल्याने उत्साह कमी झालेला नाही. उत्साह वरातीपुरता मर्यादित नाही. मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसोबत आनंद लुटण्याचे आता खूप पर्याय आहेत. लग्नातील आनंदी वातावरण कायम ठेवण्यासाठी संगीत-संध्या, मेहंदी कार्यक्रम हलक्याफुलक्या स्पर्धा आयोजन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. लग्न सोहळ्याला आधुनिकतेचा साज आला असला तरी सर्व प्रथा परंपरा जपणे देखील तितकेच आवश्यक आहे.
- तेजस गरुड, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft India Investment : 'मायक्रोसॉफ्ट' भारतात दीड लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार; सत्या नडेलांची मोठी घोषणा!

Dhananjay Munde: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी 35 वकिलांची फौज; पैसा कोण पुरवतंय? कोर्टाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड- एकनाथ शिंदे

Mumbai News: रिक्षाचालक मुंबईच्या गतीचे हृदय! मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

Central Railway: नाताळ-नववर्षासाठी मध्य रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या; पण कोणत्या मार्गावर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT