पिंपरी, ता. ३ : ‘दर्द से हमदर्द तक’ संस्था व एसएनबीपी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ता. १२ आणि १३ जुलैला मोरवाडीतील एसएनबीपी विधी महाविद्यालयामध्ये ही स्पर्धा होणार आहे. यासाठी ‘कॉलेजियम सिस्टम - शाप की वरदान?’ हा विषय असून प्रथम पारितोषिक तीस हजार रुपये, द्वितीय पारितोषिक वीस हजार रुपये तसेच उत्कृष्ट वक्ता आणि उत्कृष्ट प्रतिवादी यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. विषयाची मांडणी करण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्लिश यापैकी कोणत्याही भाषेत करता येणार आहे. कॉलेजियम सिस्टम देशातील उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नियुक्तीची महत्त्वाची पद्धत आहे. जगात सर्वोत्तम मानली जाणारी ही पद्धत चांगली की वाईट याबाबतीत देशात अजूनही चर्चा होत आहे. त्याबाबतीत विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आल्याची माहिती ॲड. प्रकाश साळशिंगीकर व सचिव डॉ. डी. के. भोसले यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.