सोमाटणे, ता. १४ ः मावळ तालुक्यात यंदा सततच्या पावसामुळे भात रोपांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली असून, भात रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भात लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता असून, उत्पादनावरही परिणाम होणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
इंद्रायणी आणि आंबेमोहर भातासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळातील किमान १३०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात दरवर्षी भात लागवड होते. मे महिन्यात शेताची मशागत करून जूनच्या अखेरीस रोपांची लागवड सुरू केली जाते. मात्र, यावर्षी मे महिन्याच्या १५ तारखेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि तो अद्याप थांबलेला नाही. या सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भातखाचरांमध्ये पाणी साचून राहिल्याने सुमारे ३० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांची रोपे खराब झाली आहेत. सध्या केवळ काही भागांतच भात रोपे वाचली असून, लागवडीसाठी आवश्यक त्या प्रमाणात रोपे उपलब्ध नाहीत. परिणामी, अनेकांची भात लावणी रखडली आहे. परिणामी यावर्षी भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
‘‘मे महिन्यातच सततचा पाऊस सुरू झाल्याने भात बियाणांची पेरणी कमी झाली. पावसाळी वातावरणामुळे भात रोपांची वाढ चांगली झाली नाही. त्यामुळे उत्पादन घटणार असून अनेक शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
- बाळासाहेब गायकवाड, प्रगतिशील शेतकरी, कुसगाव
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.