पिंपरी-चिंचवड

रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी घ्या असा आहार

CD

पिंपरी, ता. १६ ः उन्हाने काहिली झालेल्या धरतीला थंडावा देणारा, बळीराजाला सुखावणारा ऋतू म्हणजेच पावसाळा. एकीकडे निसर्ग मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण करत असतो. अशा वेळी अनेक आरोग्याच्या समस्याही डोके वर काढतात. कीटकजन्य आजारांसोबतच सर्दी, ताप, फ्लू आणि पोटाचे विकार यासारख्या संसर्गजन्य आजारांचाही धोका वाढतो. यापासून रक्षण करून आपले आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर रोगप्रतिकारक क्षमता उत्तम असणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

पचनशक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचे सेवन
पावसाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे उष्ण व पचनास जड असणारे अन्न टाळणे आवश्‍यक ठरते. त्यामुळे बाहेरचे जड पदार्थ टाळून घरातील ताजे व हलके अन्न खावे असे डॉक्टर सांगतात. त्यासोबतच पचनशक्ती वाढविण्यासाठी हिंग, लसूण, आले, हळद यांचा आहारात समावेश करणे आवश्‍यक ठरते. हे मसाले घालून केलेल्या भाज्या किंवा सूपचे सेवन केल्यास पचनशक्ती वाढून ऊर्जा मिळते. त्यामुळे विविध डाळींचे व भाज्यांचे सूप यांचे सेवन करावे, असा सल्ला दिला जात आहे.

फळभाज्यांचा आहारात समावेश
पावसाळ्यात पालेभाज्या लवकर खराब होतात. त्यामुळे पालेभाज्यांचे जेवणातील प्रमाण कमी करून फळभाज्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामध्ये पडवळ, घोसाळी, कारले, दोडका, तोंडली, लाल भोपळा, दुधी भोपळा यांचे सेवन वाढविणे गरजेचे आहे. ज्यामुळे शरीरामध्ये जंतूसंसर्ग होण्याचा धोका टळतो आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

प्रथिने खा पण जपून
रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी प्रथिनयुक्त पदार्थांवर भर दिला जातो. मात्र, हे प्रथिने खाताना पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे पनीर, दही, मांस, अंडी यांचे सेवन कमी करून कडधान्यांचे आहारात समावेश करावा. उडीद, हुलगा, मूग यासारख्या डाळींचे सेवन करावे. दुधाचे सेवन करताना सुंठ, वेलची टाकलेले किंवा हळदीचे दूध प्यावे.

रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी सुका मेवा
फळांमध्ये पाण्याचे प्रमाण असते, त्यामुळे पावसाळ्यात सर्दी होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात फळांचे सेवन करताना काळजी घ्यावी. आंबट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. पेरू, डाळिंब, मोसंबी यासारख्या फळांचे सेवन काही प्रमाणात करू शकता. मात्र, फळांऐवजी काजू, बदाम, अक्रोड, काळे मनुका, खजूर यांसारख्या सुका मेवा खाल्ल्यास आरोग्याला फायदेशीर ठरू शकते.

भूक कमी होऊन वात वाढलेला असतो. त्यामुळे पावसाळ्यात हलके पदार्थ खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, त्याचसोबत आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवायची असेल तर आहारात योग्य बदल करणेही गरजेचे आहे. पावसाळ्यातील थंड हवेमुळे ताजे गरम अन्न सेवन करावे. मात्र, जास्त उष्ण पदार्थांचे अतिसेवन करणे टाळावे.
- वैद्य नीलेश लोंढे, आयुर्वेदाचार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Latest Marathi News Updates : राज ठाकरेंचा उद्या मीरा रोड दौरा

SCROLL FOR NEXT