पिंपरी-चिंचवड

सेक्टर १२ गृहसंकुलातील नागरिक त्रस्त

CD

पिंपरी, ता. १९ ः पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सेक्टर १२ येथे विकसित केलेल्या गृह संकुलातील नागरिकांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे सदनिकेसाठी लाखो रुपये मोजलेल्या नागरिकांना पश्चात्ताप होत आहे. तक्रारी केल्या तरी फक्त तोंडी आश्वासने मिळतात. पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आवास योजनेंतर्गत हक्काची घरे बांधून देण्यासाठी बहुमजली गृहसंकुलात चार हजार ७१९ लाभार्थ्यांना दोन वर्षांपूर्वी सदनिकांचा ताबा देण्यात आला. त्यानंतर मात्र ‘पीएमआरडीए’ने समस्या सोडविण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे समस्यांनी उग्र रुप धारण केल्याची नागरिकांची तक्रारी आहे.
------
ओलसर भिंती, ‘पीओपी’ खराब
येथील सदनिकांच्या छताला गळती लागली आहे. काही नागरिकांनी नियमबाह्य बदल करून सदनिकेत तोडफोड केले आहेत. हे काम लवकर होत नसल्याने खालील मजल्यावरील रहिवाशांना फटका बसतो. छताला गळती लागू भिंती ओलसर होतात. घरातील फर्निचर, ‘पीओपी’ तसेच भिंतींना दिलेला रंग खराब झाला आहे. सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा धड चालत नाही. दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रश्न तीव्र आहे. आता महापालिकेने भाडे सुरु केल्यास नागरिकांना आणखी भुर्दंड सहन करावा लागेल.
------
तक्रारीनंतर कारवाई नाही
येथील रहिवाशांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तक्रार निवारण समिती तयार करण्याचे आश्वासन ‘पीएमआरडीए’ने दिले. समितीत त्यांचे काही अधिकारी आणि रहिवाशांचा समावेश असणार होता. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आपल्या तक्रारी कोण सोडविणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
---------
प्रकल्पातील समस्या
- पावसाळ्यातही टँकरने पाणी मागविणे भाग
- कचरा व्यवस्थापन होत नाही
- स्वच्छता वेळेवर होत नाही.
- दोन सदनिकाधारकांसाठी एकच पार्किंग दिल्याने वादावादी
- दोन वर्षे होऊनही सोसायटी हस्तांतर नाही
- वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना पाणी मिळत नाही.
--------

रहिवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण समिती नेमण्याचे आश्वासन दिले. ही समितीच अजून स्थापन झालेली नाही. बांधकामाबाबत तक्रार केल्यानंतर कंत्राटदारावर कारवाईचे आश्वासन दिले जाते, पण नोटीस बजावून वेळ मारून नेली जाते. समस्या सुटत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आता आयुक्तांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.
- अॅड. अतुल कांबळे
---
सेक्टर १२ मधील रहिवाशांच्या प्रकल्पासंदर्भात काही तक्रारी आल्या आहेत. तेथे फार मोठ्या समस्या नाहीत. आम्ही वेळोवेळी पाहणी करून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या आहेत. त्यादृष्टिने तातडीने उपाययोजना करण्याची सूचना विकसकांना दिली आहे.
- संजय पाटील, कार्यकारी अभियंता, अभियांत्रिकी विभाग, ‘पीएमआरडीए’
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : राज आणि मी २० वर्षांनी एकत्र आलोय, हिंदी भाषिकांनाही आनंद; कोणाला पोटशूळ झालाच असेल तर... उद्धव ठाकरेंचा टोला

बॅनरवर फोटो नसल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा वाद! पालकमंत्री सरनाईकांच्या स्वागतासाठी लावलेले 8 ते 10 बॅनर कार्यकर्त्यांनीच फाडले

ENG vs IND, 4th Test: टीम इंडियात मोठा बदल! CSK च्या २४ वर्षीय गोलंदाजाची अचानक संघात एन्ट्री

Engineer Drug Dealer : सॉफ्टवेअर इंजिनिअर वृषभ बनला ड्रग्ज डिलर, नशेने आयुष्याची राख रांगोळी, विमानाने दिल्ली... ट्रकने कोल्हापूर प्रवास

‘देवीचा अवतार घेऊ पाहिलं आणि स्टेजवरच अपमान झाला!’ ममता कुलकर्णीचा व्हिडिओ तुफान व्हायरल!

SCROLL FOR NEXT