वडगाव मावळ, ता. १७ : आंदर मावळातील चाळीस गावे व वाड्यावस्त्यांना जोडणाऱ्या टाकवे बुद्रूक येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाला धोकादायक ठिकाणी संरक्षण कठडे अथवा संरक्षक जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी आंदर मावळमधील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष काळुराम मालपोटे, नारायण ठाकर, माजी सरपंच तुकाराम असवले, दिगंबर आगिवले, कल्हाटचे सरपंच शिवाजी करवंदे, कोंडिवडेच्या सरपंच राधाबाई मुंढारकर, भोयरेचे माजी सरपंच बळिराम भोईरकर आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना याबाबत निवेदन दिले.
टाकवे बुद्रूक येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल कालबाह्य झाल्याने आमदारांच्या माध्यमातून नवीन पूल बांधून पूर्ण करण्यात आला. या पुलावरून वाहतूकही सुरू झाली. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूने चढ-उतार व वळणदार रस्ता आहे. वळण रस्त्यावर व पुलावर संरक्षण भिंत अथवा जाळी लावली नाही. नवीन पुलावरून वाहनांची सतत वर्दळ असल्याने संरक्षण कठड्याअभावी अपघात होण्याची शक्यता आहे. या पुलावरून टाकवे औद्योगिक वसाहतीमधील वाहने तसेच आंदर मावळातील सुमारे चाळीस गावे व वाड्यावस्त्यांमधील नागरिकांची ये-जा असते. दोन्ही पुलांचे रस्ता विभाजन जेथून सुरुवात होते तेथून पुलाच्या कठड्यापर्यंत संरक्षक कठडे उभारण्याची गरज आहे. अन्यथा अपघाताचा धोका संभवतो. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित उपाययोजना करावी. पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे अथवा जाळी लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.