वडगाव मावळ, ता. १९ : कोकण व मावळ भागातून कार्तिकी वारीसाठी आळंदीला येणाऱ्या पायी दिंड्यांचे पुणे-मुंबई महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावी या मागणीसाठी मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार महाराज भसे यांनी सांगितले.
कोकण विभागातून येणाऱ्या वारकरी दिंड्या या पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करत असताना अनेकदा अपघात झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी कान्हे फाटा येथे एक मोठा अपघात झाला होता. तर यावर्षी कामशेत येथे अपघात झाला. या अपघातांमध्ये अनेक वारकरी मृत्युमुखी पडले आहेत. तर अनेक वारकरी जखमी झाले आहेत. हे वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी दिंड्यांना पोलिस संरक्षण मिळावे. तसेच ही कार्तिकी वारी आषाढी वारीच्या सोहळ्याप्रमाणे एकाच ठिकाणाहून सर्व दिंड्या एकत्रितपणे निघाव्यात यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामार्फत प्रयत्न करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष भसे यांनी सांगितले.
याबाबत मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप वावरे, सचिव रामदास पडवळ, विश्वस्त बजरंग घारे, कार्याध्यक्ष संतोष कुंभार, शिवाजी पवार, कायदेशीर सल्लागार ॲड. सागर शेटे आदी पदाधिकाऱ्यांसह लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.