पिंपरी : आयटीमध्ये काम करणाऱ्या सुरेशकडे ५ मार्चपर्यंत काम होतं. पण प्रोजेक्ट नसल्यामुळं तो बेंचवर गेला. त्यानंतर २५ मार्चला लॉकडाउन सुरू झाला. या काळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना आली. त्यामुळे प्रोजेक्ट मिळविण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. दुर्दैवाने लॉकडाउनचे अडीच महिने झाले. मात्र, कंपन्यांकडे नवे प्रोजेक्ट नसल्यामुळे त्याला काम मिळालं नाही. त्यामुळे नोकरी राहते की जाते, या गर्तेत तो सापडला.
कोरोनाच्या संकटामुळे आलेल्या लॉकडाउनचा फटका आयटी कंपन्यांना बसला असून, गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या नवीन कामाचे प्रमाण 40 टक्यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. त्याचा मोठा फटका या कंपन्यांमध्ये बेंचवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसलाय. त्यांना सरसकट पगार कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात आतापर्यंत सुमारे एक हजार आयटीयन्सनी तक्रारींची नोंद कामगार आयुक्त कार्यालयाकडे केली असून, यासंदर्भात लवकर मार्ग काढण्याची मागणी केली आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या कारणांमुळे आयटीयन्स त्रस्त...
कोरोनाचे संकट जगभर वाढल्यानंतर आयटी कंपन्यांकडे असणाऱ्या कामाचा ओघ कमी झाला. त्याचा फटका थेट कर्मचाऱ्यांना बसू लागलाय. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर बेंचवरील आयटीयन्स कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झालीय. सध्याच्या स्थितीत हा आकडा 20 हजारापर्यंत जाऊन पोहोचलाय. दरम्यान, मोठ्या आणि मध्यम आकाराच्या आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी बेंचची व्यवस्था असते. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्यापासून बेंचवर असणाऱ्या कर्मचारी हातात काम नसल्यामुळे तणावाखाली आहेत. सुरुवातीच्या काळात बड्या आयटी कंपन्यांनी या कर्मचाऱ्यांना हक्काच्या सुट्या घेण्यास भाग पाडले. अनेकांनी कंपनीकडून केलेल्या सूचनेला नकार न देता या सुट्या घेतल्या होत्या. आता या कंपन्यांनी बेंचवरील कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बेंचवरील कर्मचाऱ्यांसमोर आता नवं संकट उभं राहिलंय.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नवी कर्मचारी भरती बंदच...
आयटी कंपन्यांकडं ट्रॅव्हल, विमान, विदेशी चलन, बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांची कामं असतात. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांकडे येणारे नवीन प्रोजेक्ट तूर्तात थांबले असल्याने कामाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. सध्या आहे त्या लोकांना काम देण्यात अडचणी येत असल्यामुळे अनेक कंपन्यांकडून नवीन कर्मचारी भरतीची प्रक्रिया तूर्तात बंद करण्यात आली आहे.
आयटी कंपनीत काम करणारे कर्मचारी बेंचवर असले, तर त्यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही. काम नसल्याचे कारण पुढे करत कंपन्यांकडून त्यांची पगार कपात होत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. आतापर्यंत अशा प्रकारांचा सामना करावा लागणाऱ्या अनेक जणांनी आपल्या तक्रारींची नोंद कामगार आयुक्तांकडे केली आहे. सध्या आयटी कंपन्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यास अजून काही काळ जावा लागेल. मात्र, त्यासाठी कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये, यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरवठा करणार आहोत.
- पवनजित माने, सदस्य, आयटी समिती, राज्य सरकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.