Pawana Dam sakal
पिंपरी-चिंचवड

पवना धरणात बुडाल्याने मुंबईतील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

पवना धरणात बुडाल्याने मुंबईतील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.

सकाळ वृत्तसेवा

पवना धरणात बुडाल्याने मुंबईतील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.

लोणावळा - पवना धरणात बुडाल्याने मुंबईतील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. ०२) घडला. सुदैवाने या घटनेत पाच जणांना स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यात यश आले.

आर्या दिपक जैन (वय-१३) व समीर कुलदीप सक्सेना (वय-४३, दोघे रा. मुंबई) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पवना धरण परिसरात फांगणे येथे घडली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत समीर कुलदीप सक्सेना हे पत्नी पायल (वय-४२),  मुले लक्ष (वय-१४), यश (वय-८) व त्यांचे मित्र आर्या जैन (वय-१३), आदी चुगानी (वय-१४), अंश सुरी (वय-१४, नोकर  रामकुमार पासवान याच्यासह शुक्रवारी पवना धरण परिसरात पर्यटनासाठी  आले होते. पवना धरण पाणलोट क्षेत्रातील‌ फांगणे गावच्या हद्दीत पवना धरणाच्या पाण्यात पोहत होते. यावेळी समीर आणि आर्या यांच्यासह इतर पाच जणांना येथील पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. समीर सक्सेना यांचा कामगार रामकुमार पासवान यांनी आरडाओरड केला.

यावेळी स्थानिक नागरिक अनिल हिलम, संजय आंद्रे, रामदास चव्हाण, रोहिदास काळे, रामदास काळे, स्वप्नील मोकाशी यांनी तत्काळ धाव घेत पाण्यात बुडत असलेल्या बाहेर काढले. घटनेची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी रफिक शेख व विजय गाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार रफिक शेख यांनी घटनास्थळी जाताच पाण्यात उतरून स्थानिकांच्या मदतीने आर्या जैन व समीर सक्सेना यांना बाहेर काढले, मात्र समीर आणि आर्या यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

प्रेमानंद महाराज बालक, संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगावा; जगद्गुरू रामभद्राचार्यांचं थेट आव्हान

सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मेट्रोच्या वेळेत बदल, पहिली ट्रेन 'या' वेळेत सुटणार

Weekly Career Horoscope: गजकेसरी योगामुळे 'या' राशींच्या जीवनात येणार आहे आर्थिक समृद्धी आणि कामातील जबरदस्त प्रगती!

Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT