Raju Misal Sakal
पिंपरी-चिंचवड

दहा रुपयांत कुठेही प्रवास पिंपरी-चिंचवडमध्ये का नाही?

पीएमपी बसमधून अवघ्या दहा रुपयांत पुणे शहरात कुठेही फिरा, ही योजना पुणे महापालिका राबवत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पीएमपी बसमधून (PMP Bus) अवघ्या दहा रुपयांत (Ten Rupees) पुणे शहरात (Pune City) कुठेही फिरा, ही योजना पुणे महापालिका (Pune Municipal) राबवत आहे. जे पुण्याच्या पदाधिकाऱ्यांना जमू शकते ते पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना का जमू नये, असा सवाल विरोधी पक्षनेता राजू मिसाळ (Raju Misal) यांनी केला आहे. (Why Not Travel Anywhere in Pimpri Chinchwad for Ten Rupees Raju Misal)

याबाबत महापौर उषा ढोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पीएमपी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी कार्यरत आहे. आपली महापालिका आपला हिस्सा पीएमपीकडे वेळोवेळी देत असते, तरीही विलीनीकरण झाल्यापासूनच आपल्या शहरावर बसमार्ग असो अथवा पूर्वाश्रमीच्या पीसीएमटीच्या कर्मचाऱ्यांवर पदोन्नती अथवा बदल्यांबाबत कायमच अन्याय सुरू आहे. आताही पुणे शहरासाठी दहा रुपयांत कुठेही दिवसभर फिरा ही योजना सुरू केली आहे.

पुण्यातील पदाधिकारी व प्रशासनास ही योजना राबविता येते, तर आपल्या महापालिकेला ती का राबविता येत नाही? आपले सत्ताधारी, पदाधिकारी, प्रशासन नागरिकांना ‘पे अँड पार्क’द्वारे नागरिकांना वेठीस व भुर्दंड बसविणाऱ्या योजना राबविण्यात धन्यता मानत आहेत. जे पुण्याच्या पदाधिकाऱ्यांना जमू शकते ते आपल्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना का जमू नये? आपल्या शहरासाठी ही योजना तातडीने सुरू करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT