Politics | राजकारण

भाजप म्हणते टिळक आणि भाजपमध्ये वैचारिक नातं

लोकमान्य टिळक आणि भाजपमध्ये वैचारिक नातं असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत. याबाबत भाजपच्या काही नेत्यांना छेडलं असता त्यांनी काही उदाहरणे देत या दाव्याचे समर्थन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे - लोकमान्य टिळक आणि भाजपमध्ये वैचारिक नातं असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत. याबाबत भाजपच्या काही नेत्यांना छेडलं असता त्यांनी काही उदाहरणे देत या दाव्याचे समर्थन केले आहे. 

कसब्याच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षानं कै. आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांपैकी कुणाला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना दिली आहे. त्यावरून भाजपवर टीकाही झाली होती. याबाबत भाजपच्या काही नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या दाव्याचं समर्थन केलं. (BJP Claiming ideological links with Lomanya Tilak)

याबाबत माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता ते म्हणाले,लोकमान्य टिळक यांचा वारसा काँग्रेस पेलूच शकत नाही. लोकमान्यांच्या तेजस्वी राष्ट्रीय बाण्याचे मोल केवळ भाजपाच जाणतो. लोकमान्यांच्या विचारांशी असलेलं नातं भाजपनं निवडणुकीच्या पलीकडं जपलेलं आहे, असंही मोहोळ यावेळी म्हणाले. 

टिळक आणि भाजप हे नातं केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही. त्याला खूप व्यापक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, असं भाजपा पुणे शहराचे सहप्रचार प्रमुख हेमंत लेले म्हणाले. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रविचाराशी भाजपची वैचारिक नाळ आहे. लोकमान्यांचा तो प्रखर वारसा स्वातंत्र्योत्तर काळात पुढे नेण्याचं काम आज भाजप करत आहे, असाही दावा लेले यांनी केला. प्रखर आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा मुद्दा लोकमान्य टिळकांनी मांडला. लोकमान्यांच्या विचारविश्वातील हा मुद्दा भाजपाने आपल्या वैचारिक तत्त्वज्ञानातला महत्त्वाचा भाग बनवला, असाही दावा या नेत्यांनी केला.

१९८४ मध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी लोकसभेतले विरोधी पक्षनेते असताना त्यांना टिळक पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. कै. जयंतराव टिळक त्यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते.  तर तृतिय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनाही हा पुरस्कार देण्यात आला होता. राष्ट्रवाद,राष्ट्रीय विचार,स्वदेशीचा विचार मांडणार्‍यांना प्रामुख्यानं टिळक पुरस्कार दिला जातो. त्यात कै. वाजपेयी आणि देवरसांचा समावेश असणे,हा टिळक आणि भाजपाच्या वैचारिक नात्यातील महत्त्वाचा दुवा आहे, असाही दावा या नेत्यांनी दावा केला.

भाजपचे नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांनी काढलेल्या सुवर्णजयंती रथयात्रेच्या वेळी टिळक वाड्याला भेट दिली होती.‘भारतीय स्वातंत्र्याच्या समराचा आवाज बुलंद करणार्‍या लोकमान्यांना त्यांच्या कर्मभूमीत येऊन वंदन करण्यात मला अधिक समाधानाची भावना असल्या’चे उद्‌गार आडवानींनी काढले होते. त्यामुळं टिळक केवळ काँग्रेसचेच हा केला दावा चुकीचा असल्याचे या नेत्यांनी सांगितले.  

टिळक परिवारातील मुक्ता टिळक यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांना नगरसेवक आणि आमदारपदाची संधी पक्षानं दिली.पुण्यात महिला महापौर होण्याची संधी मिळाल्यानंतर भाजपाने मुक्ता टिळक यांची त्या पदासाठी निवड केली, अशीही पुस्ती या नेत्यांनी जोडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT