Amitabh Bachchan
Amitabh Bachchan  Sakal
Premier

Amitabh Bachchan : दहा दिवस चित्रीकरण करुन अमिताभ यांनी सोडला होता चित्रपट

सकाळ वृत्तसेवा

अभिनेते अमिताभ बच्चन हे चित्रपट जगतातील सम्राट म्हणून ओळखले जातात. त्यांचे खरे आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हते; पण अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक घटना तुम्‍हाला आश्चर्यचकित करेल.

जेव्हा अमिताभ बच्चन ‘शोले’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्‍त होते, त्‍याचदरम्‍यान ते दुसऱ्या एका चित्रपटाचे चित्रीकरणदेखील करत होते. त्‍या दुसऱ्या चित्रपटाच्या दहा दिवसांच्या चित्रीकरणानंतर दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटातून काढून टाकले होते. त्‍या चित्रपटाचे दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी होते. त्यांनी आधी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना कास्ट केले होते; पण नंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या जागी त्या काळातील दुसरे मोठे अभिनेते धर्मेंद्र यांना या चित्रपटात घेतले.

अशाप्रकारे पहिल्यांदाच धर्मेंद्र आणि जया बच्चन पडद्यावर एकत्र दिसले. १९७१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गुड्डी’ हा तो चित्रपट होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची खास भूमिका होती. त्यावेळी ऋषिकेश मुखर्जी दोन चित्रपट बनवत होते.

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा ‘आनंद’ आणि दुसरा जया बच्चन, सुमित सन्याल आणि अमिताभ यांच्यासोबतचा ‘गुड्डी’ हे ते चित्रपट होते. त्यांचे दोन्ही चित्रपट एकमेकांशी स्पर्धा करू नयेत, असे दिग्दर्शकांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याऐवजी धर्मेंद्र यांना चित्रपटात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT