पुणे

कॉर्पोरेट्सच्या आर्थिक स्थिरतेसाठी 17 महिने लागणार; कार्पोरेट क्षेत्राबाबत टीआरए रिसर्चचा अहवाल 

अक्षता पवार

पुणे - कोरोनाचे संकट, जागतिक मंदी, आर्थिक प्रगतीची धूसर शक्यता आणि सामाजिक अशांततेमुळे निर्माण झालेल्या स्थितीत कार्पोरेट क्षेत्र आर्थिक गर्तेत सापडले आहे. त्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी किमान १७ महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असे टीआरए रिसर्च या ‘कन्झ्युमर इन्साइट व ब्रँड अॅनालिटिक्स कंपनी’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. 

कन्झ्युमर इन्साइटविषयीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केल्यानंतर टीआरएने नुकताच दुसरा अहवाल प्रकाशित केला आहे. ‘टीआरएज कोरोनाव्हायरस कॉर्पोरेट इनसाइट्स २०२०’ नावाचा हा अहवाल आहे. 

टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी अहवालातील निष्कर्षांविषयी सांगितले, की जागतिक मंदी ही भारतीय कॉर्पोरेटपुढील सर्वात मोठी चिंता असून, काळजी घेणाच्या निर्देशकांवर जागतिक मंदी ६६ टक्के आहे. त्यानंतर चिंतेचा विषय आरोग्याच्या बाबतीत निर्माण झालेल्या संकटावर मात करणे हा आहे. त्याचे प्रमाण ५९ टक्के आहे. व्यवसाय टिकाव धरू शकणे, भारतातील आर्थिक स्थितीच्या वाटचालीचा निराशाजनक अंदाज व सामाजिक अशांतता हे तीन घटक ५७ टक्के आहेत. सध्या देशातील कॉर्पोरेटसमोर असलेली अनेक आव्हाने आहेत. ग्राहकांचा ढासळलेला आत्मविश्वास हा सर्वात खाली, म्हणजे ३९ टक्क्यांवर आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बाबतीत असलेली चिंता काहीशी कमी आहे. कॉर्पोरेट सध्या अडथळे ठरणाऱ्या मोठ्या घटकांचा विचार करत असल्याचे यातून स्पष्ट होते. 

वरिष्ठ व्यवस्थापनाला सामना कराव्या लागणाऱ्या बाबतींत बाजारातील तफावत हा घटक सर्वाधिक म्हणजे ३२ टक्के असल्याचे सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. या सर्व गोष्टींची सांगड घालण्याचे आव्हान वरिष्ठ व्यवस्थापनासमोर आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोविडमुळे झालेला परिणाम विचारात घेता, परिणामांच्या निर्देशाकांमध्ये सर्वात वरच्या स्थानी या वर्षाचे उत्पन्न ७५ टक्के होते. त्यानंतर ६४ टक्के परिणाम झालेल्या जाहिरातींचा नंबर होता. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये मागणी किरकोळ असल्याने तातडीने नियंणात आणता येतील, अशा खर्चांमध्ये कपात केली जाणार असल्याचे यातून स्पष्ट होते. 
- एन. चंद्रमौली, टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी 
 

कॉर्पोरेटसमोरील प्राधान्यक्रम 

- ६९.५ टक्के प्राधान्य असणारी देखभाल कपात सर्वात वरच्या स्थानी 
- दुसऱ्या क्रमांकावर, ६५.५ टक्के प्राधान्य असणारी कपात ही भांडवली खर्चावर 
- बिझनेस स्ट्रॅटेजीसाठी (व्यवसाय धोरण) ६४.५ टक्के कपातीचे प्राधान्य 
- कंपनी ऑपरेशन्सना ५६.५ टक्के प्राधान्य 
- मनुष्यबळासाठीच्या खर्चामध्ये कपात करणे, यास सर्वात शेवटचे म्हणजे ५१.५ टक्के प्राधान्य 

सर्वेक्षणाबाबत... 

- हा अहवाल ८ एप्रिल ते ४ मे कालावधीत तयार करण्यात आला. 
- यामध्ये १६ शहरांतील १०१ कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेण्यात आली. 
- आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरासरी ६६.१आठवडे (१६.५महिने) लागतील 
- तसेच संपूर्ण क्षेत्र सुरळित होण्यासाठी १५ आठवडे (३.८ महिने) लागतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT