Dr. Ashish Nerlekar sakal
पुणे

Pune News : माळरानांवरील ६५ वनस्पती होताहेत नष्ट; ‘मिशिगन’चे डॉ. आशिष नेर्लेकर यांचे संशोधन

माळरानावर शेती किंवा चुकीच्या वनीकरणामुळे ६५ स्थानिक वनस्पती नष्ट होत असल्याची गंभीर बाब संशोधनातून समोर आली आहे.

सम्राट कदम

पुणे - माळरानावर शेती किंवा चुकीच्या वनीकरणामुळे ६५ स्थानिक वनस्पती नष्ट होत असल्याची गंभीर बाब संशोधनातून समोर आली आहे. केवळ जंगलतोडच नाही, तर गवताळ प्रदेशातील मानवी हस्तक्षेप आणि पडीक जमीनही जैवविविधतेला धोकादायक ठरत असून, वेळीच धोरणात्मक उपायांची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रेसिंडंट पोस्ट डॉक फेलो असलेले डॉ. आशिष नेर्लेकर यांच्या नेतृत्वात संशोधन झाले आहे. मूळचे पुण्यातील नेर्लेकर यांनी २०२१च्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्राच्या सात जिल्ह्यांतील गवताळ प्रदेशांचा तुलनात्मक अभ्यास करून संशोधन प्रसिद्ध केले आहे.

नेर्लेकर सांगतात, ‘जंगलांवरील मानवी हस्तक्षेपाविरोधात आपण सर्वच सजग आहोत. पण, माळरानावर झालेल्या मानवी हस्तक्षेपाला आपण फारसे गांभीर्याने घेत नाही. तेथील वनीकरण असो किंवा शेतीखाली आणलेली जमीन, एवढेच काय पडीक पडलेल्या जमिनीमुळेही स्थानिक जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे.’

जैवविविधतेच्या संवर्धनासाठी माळरानांसंबंधीही धोरणात्मक पावले उचलण्याची गरज नेर्लेकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांचे संशोधन ‘ब्रिटिश इकॉलॉजिकल सोसायटी’ या प्रतिष्ठीत शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. संशोधनात आविष्कार मुंजे, प्रणव म्हैसाळकर, अंकिता हिरेमठ, जोसेफ वेल्डमन यांचा सहभाग आहे.

असे झाले संशोधन

  • नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ६० माळरानांची निवड

  • नैसर्गिक माळरान, वनीकरण, शेती आणि पडीक जमीन अशा चार प्रकारांतील प्रत्येकी एक चौरस मीटर भू-भागाची संशोधनासाठी निवड

  • मिळालेल्या प्रत्येक जागेतील वनस्पतींचे विश्लेषण केले

  • चारही प्रकारांतील स्थानिक वनस्पतींचा तुलनात्मक अभ्यासातून निष्कर्ष मांडले.

निष्कर्ष

  • माळरानांवरील वनीकरणामुळे १२ पैकी तीन आणि शेतीमुळे १२ पैकी सहा स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होतात

  • माळरानावरील कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपामुळे सरासरी ६५ स्थानिक प्रजाती नष्ट होतात

  • कुरकुंडी आणि कंदील फुलासारख्या दुर्मिळ किंवा अतिधोकादायक स्थितीतील प्रजातींनाही धोका

  • शेती करून पडीक पडलेली जमिनीत उपद्रवी तणांची वाढ होते

  • गवताळ प्रदेशात आग लागणे आणि शेळ्या-मेंढ्यांचे कुरण करणे जैवविविधतेसाठी फायद्याचे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT