...अन्‌ कारागृहातुन सुटल्यानंतर त्यांच्या हाताला मिळाला रोजगार !  
पुणे

...अन्‌ कारागृहातुन सुटल्यानंतर त्यांच्या हाताला मिळाला रोजगार !

कारागृह प्रशासन, भोई फाऊंडेशन व आदर्श मित्र मंडळाकडून शिक्षा संपवून बाहेर पडलेल्यास दिली व्यावसायाची संधी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पत्नीसमवेत भांडणे झाल्यानंतर झटापटीत पत्नीला धक्का लागला. त्यामुळे पायऱ्यांवरुन खाली पडल्याने पत्नीचा मृत्यु झाला. या घटनेत पतीला शिक्षा झाली. पतीने हि शिक्षा पुर्ण केली, मात्र इथून बाहेर पडल्यानंतर पुढे काय ? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहीला. त्यांच्या या प्रश्‍नाची दखल घेऊन त्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळाने केशर्तनालयाच्या व्यवसायासाठी मदत केली आणि उध्वस्त झालेल्या त्यांच्या आयुष्याला नवी पालवी फुटली.

महाराष्ट्र कारागृह प्रशासन व भोई प्रतिष्ठान,आदर्श मंडळ यांच्या माध्यमातून "प्रेरणापथ' या प्रकल्पांतर्गत कारागृहातून शिक्षा पूर्ण करून बाहेर पडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात दिला जातो. त्यानुसार, संतोष आतकर यांनाही सामाजिक संस्था, मंडळांनी एकत्र येऊन केशकर्तनालयाचा व्यावसाय सुरू करून दिला. या व्यावसायाचा व्यावसायाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी सकाळी कारागृह प्रशासनाच्या कार्यालयात पार पडला. यावेळी कारागृह विभागाचे अतिरीक्त पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, येरवडा कारागृहाच्या अधिक्षक राणी भोसले, डॉ. मिलिंद भोई, ऍड. प्रताप परदेशी उपस्थित होते.

"प्रेरणापथ" उपक्रमाद्वारे आतकर यांनी भोई प्रतिष्ठानचे डॉ.मिलिंद भोई यांच्याशी संपर्क साधून त्यांना कारागृहातुन बाहेर पडल्यानंतर व्यावसाय सुरू करण्यासाठी मदत मागितली. त्यानंतर प्रतिष्ठानतर्फे त्यांना केशकर्तनालयासाठी आवश्‍यक साधनसामुग्री, दुकानाची व्यवस्था करून दिली.

"जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होऊ नये म्हणून मी आता सांगलीत केशकर्तनालयाच्या माध्यमातून नवीन आयुष्य सुरू केले आहे. त्यासाठी कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळाने साथ दिली.'' असे आतकरी यांनी सांगितले.

"आयुष्यात कोणीच परिपुर्ण नसतो. चुकून घडलेल्या एखाद्या घटनेमुळे कारागृहात जावे लागते. हा डाग घेऊन आयुष्यभर जगावे लागते. बंदी म्हणून शिक्का बसल्यावर समाजही जवळ घेत नाही. मात्र एखादा व्यक्ती कारागृहात गेला म्हणून त्यास आयुष्यभर दोष देणे योग्य आहे का ? याचा समाजाने विचार केला पाहीजे. सुधारसेवा हा कारागृह प्रशासनाचा महत्वाचा भाग आहे. आता कैद्यांना कारागृहातून बाहेर पडल्यानंतर आयुष्यात उभारी घेण्यासाठी सहकारी बॅंक पुढे आली आहे. त्याप्रमाणे राष्ट्रीकृत बॅंकांनीही पुढे यावे..''

-अतुलचंद्र कुलकर्णी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray: कोण होत्या मीनाताई ठाकरे? बाळासाहेबांच्या झंजावात राजकारणात होता सिंहाचा वाटा

Nagpur Municipal Corporation: 'नागपूर मनपा निवडणुकीला महागाईचा फटका'; २० कोटींचा अंदाजित खर्च, २४ लाखांहून अधिक मतदार

Nano Banana AI Durga Puja 2025 Saree Look Prompts: 'हे' 5 प्रॉम्प्ट कॉपी करा अन् जनरेट करा फेस्टिव्हल साडी लूक

Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसी पोलिसांचा पर्यावरणासाठी पुढाकार, देशी वृक्षांची लागवड

Mumbai Local Viral Video: दिव्यांगजन कोचमध्ये सामान्य प्रवाशांची घुसखोरी, आरक्षित डब्ब्यात चढण्यासाठी दृष्टिहीनांचे हाल

SCROLL FOR NEXT