पुणे

प्लॅस्टिकबंदीचा वारकऱ्यांमध्ये संभ्रम

सकाळवृत्तसेवा

आळंदी - आषाढी पालखी सोहळा दहा-बारा दिवसांवर आलेला आहे. सरकारच्या प्लॅस्टिकबंदी धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे वारकरी व दुकानदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

तीन महिन्यांपासून वारीची तयारी करणाऱ्या पालखी सोहळ्यातील दिंडी चालक-मालकांसह मोफत वस्तू आणि खाद्यपदार्थ वाटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची बहुतांश खरेदी पूर्ण झाली. मात्र, प्लॅस्टिकबंदीमुळे प्लॅस्टिकचा कागद, जेवणाच्या पत्रावळी आणि कचरा गोळा करण्यासाठी मोठ्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराबाबतचा संभ्रम वारकऱ्यांमध्ये कायम आहे. वारीत जेवणासाठी अनेक जण थर्माकोलच्या पत्रावळी वापरतात. झोपताना जमिनीवर अंथरण्यासाठी अनेक जण प्लॅस्टिक, तसेच पावसापासून संरक्षणासाठी मेणकापड वापरतात. अनेक स्वयंसेवी संस्था वारकऱ्यांना हे प्लॅस्टिकचे कागद मोफत वाटतात. 

आळंदी व देहूसारख्या मोठ्या गावांतील दुकानदारांनी प्रसादासाठीचे मुरमुरे, बत्तासे, साखरफुटाणे, गंध, बुक्का, प्लॅस्टिकच्या खेळण्याची खरेदी केली आहे. धूळ आणि पावसापासून खेळण्याचे संरक्षण व्हावे, यासाठी अगोदरच खेळण्यांना प्लॅस्टिकचे आवरण असते. आता पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खेळणी प्लॅस्टिकमुक्त करा नाही तर जप्त होतील, असे सांगितले. यामुळे दुकानदारांवर ऐन वारीत प्रसाद आणि खेळणी विकण्यावर प्लॅस्टिकबंदीचे सावट आले आहे. चोपदार फाउंडेशन आणि काही संस्था निर्मलवारी म्हणून पालखी तळाची स्वच्छता राखण्यासाठी दिंड्यांना कचरा आणि शिल्लक अन्न गोळा करण्यासाठी दहा किलोच्या मोठ्या प्लॅस्टिक बॅग देत असतात. त्यानंतर स्थानिक पातळीवर पालिका किंवा ग्रामपंचायत हा गोळा झालेला कचरा घंटागाडीने वाहून नेतात. मात्र, प्लॅस्टिक बॅगलाच बंदी असल्याने वारीतील दिंड्यांनी पालखी तळावर कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, याबाबत प्रशासनाकडून तयारी नाही आणि सूचनाही नाही. 

वारी काळात खाद्यपदार्थ, तसेच बिस्कीट, गुडदाणी, शेंगदाणा लाडू, खजूरसारख्या खाद्यपदार्थ वाटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची लक्षणीय संख्या आहे. मात्र, आता या संस्थांनाही प्लॅस्टिक बंदीमुळे काळजी घ्यावी लागणार आले. वारीच्या वाटेवर चहा विक्रेते आजपर्यंत प्लॅस्टिकच्या कपाचा सर्रास वापर करत. आता मात्र या विक्रेत्यांनाही कागदी कपाचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. 

वारीत दिंड्यांतील वारकऱ्यांना जेवणासाठी थर्माकोलची पत्रावळ वापरण्यास बंदी असल्याने आळंदी देवस्थान प्रत्येक दिंडीला एक हजार कागदी, पानाच्या पत्रावळीचे वाटप करणार आहे. माउलींच्या सोहळ्यात चारशे दिंड्या असल्याने सुमारे चार लाख कागदी, पानाच्या पत्रावळी मोफत देणार आहेत. तळाच्या स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. पावसाळ्यात अंगावर घेण्यात येणाऱ्या मेणकापडाबाबत सरकारचे धोरण शिथिल करण्याबाबत देवस्थानच्या वतीने विनंती करणार आहे.
-ॲड. विकास ढगे, पालखी सोहळा प्रमुख, आळंदी देवस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT