aj.jpg
aj.jpg 
पुणे

नव्वदीतल्या 'त्या' चार आजींनी हरवले कोरोनाला; वाचा त्यांना हे कसे शक्य झालं

गजेंद्र बडे

पुणे : कोरोना हा काही गंभीर आजार नाही. आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर कोरोनाला कोणीही सहज हरवू शकतो, हे ऐंशी-नव्वदीतील वयाच्या चार आजींनी दाखवून दिले आहे. या चारही आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यातून कोरोना हा सर्वसामान्य आजारांसारखाच एक आजार नसून तो पुर्णपणे बरा होतो, हाच संदेश मिळाला आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने विप्रोच्या सहकार्याने बालेवाडी येथे सुरू करण्यात कोवीड रुग्णालयात या चार आजींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या चौघींना उपचारानंतर मंगळवारी (ता.४) सायंकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

यापैकी दोन आजी या वेल्हे तालुक्यातील वांजळे येथील, एक आजी भोर तालुक्यातील उत्रौली तर एक आजी या पुणे शहरातील दापोडी येथील आहेत. या चारपैकी तिघी जणी ८० वर्षे तर, एक आजी ९० वर्षे वयाच्या आहेत.

बालेवाडी येथील हे विप्रो रुग्णालय १४ जुलैपासून सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात पहिल्या दिवशी पाच रुग्ण दाखल झाले होते. त्यानंतर या चारही आजींना २५ जुलैला कोरोनावरील उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, या चारही आजीवर दहा दिवस उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्या चौघीही कोरोनातून पुर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे विप्रो रुग्णालयाचे उप अधीक्ष डॉ. बालाजी लकडे यांनी सांगितले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT