road
road sakal
पुणे

रस्त्याचे डांबरीकरण नाही तर किमान खड्डे तरी बुजवा

सकाळ वृत्तसेवा

उंड्री - एनआयबीएम रोड, भिंताडेनगर, हांडेवाडी रोड, महंमदवाडी-सय्यदनगर रस्त्यावरील अतिक्रमणे आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा होऊन निर्माण होत आहे. रस्ता कमी, खड्डे जास्त अशी रस्त्याची स्थिती असल्याने वाहनचालक कमालीचे त्रासले आहेत. पालिका प्रशासनाने रस्त्याचे डांबरीकरण नाही, तर किमान खड्डे तर नीटनेटके बुजवावेत, अशी आर्जवी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

दरम्यान, ओंकार होले, शशिकांत पुणेकर, उत्तम फुलावरे, राजेंद्र भिंताडे, श्रीकांत भिंताडे, अक्षय टकले, दादासाहेब कड, विक्रम आल्हाट, धनंजय हांडे, म्हणाले की, महंमदवाडी परिसरामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे.

जय भवानी चौकामध्ये महापालिकेचा भानगिरे दवाखाना असून, उपचारासाठी परिसरातील नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. त्याचबरोबर जय भवानी चौकातून उंड्री चौक आणि हांडेवाडी चौक कात्रज-मंतरवाडी बायबास रस्त्याकडे वाहनांची सतत वर्दळ असते. खड्डेमय रस्ते आणि गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने असल्याने दुचाकीला अपघाताचा धोका वाढल्याचे त्यांनी सांगितले.

रिबेका कांबळे म्हणाल्या की, महंमदवाडीतील जय भवानी (न्याती चौक) चौकामधून पीएमपी बस वळण घेताना वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूककोंडी होत असल्याने होत आहे. पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाने वाहतूक सुरळीत होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असा सल्लाही त्यांनी सूचविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT