Avinash Dharmadhikari statement country needs to know history of Marathas sakal
पुणे

‘मराठ्यांचा इतिहास देशाला कळण्याची गरज’ - अविनाश धर्माधिकारी

‘शतक पाहिलेला माणूस’ स्मृतिग्रंथाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास क्रमिक पुस्तकांतून दाबण्यात आला. ही पुस्तके प्रसारित करणाऱ्यांनी केवळ दीड-दोन पानांत या इतिहासाची बोळवण केली, अशी टीका मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केली. ‘मराठ्यांचा इतिहास म्हणजे संधीकाळातील तळटीप नाही, तर महाराष्ट्राने देशाकरिता केलेल्या पराक्रमाचा दैदीप्यमान इतिहास आहे. हा इतिहास सगळ्या देशाला समजायला हवा’, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

सह्याद्री प्रकाशनतर्फे डॉ. सागर देशपांडे संपादित ‘शतक पाहिलेला माणूस’ या बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, माजी खासदार प्रदीप रावत आदी उपस्थित होते.

डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘‘बाबासाहेब पुरंदरे यांनी लोकांच्या दृष्टीतून इतिहास लिहिला, त्यामुळे त्यात लालित्य होते. त्याला चूक म्हणायचे कारण नाही. त्यांनी पुराव्यांवर आधारित इतिहास लिहिला. ज्या ज्या व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला, त्या सर्वांपेक्षा अधिक खरा इतिहास ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथातून बाबासाहेबांनी मांडला.’’

गोखले म्हणाले, ‘‘सर्जिकल स्ट्राईक आपण आत्ता केला, असे आपल्याला वाटते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला हल्ला हा पहिला सर्जिकल स्ट्राईक होता. गनिमी कावा, सर्जिकल स्ट्राईक अशा अनेक गोष्टी आपण इतिहासातूनच घेतल्या आहेत.’’ डॉ. देशपांडे म्हणाले, ‘‘ज्यांनी बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार दिले, त्यांनीच नंतर बाबासाहेबांवर टीका केली. अशा लोकांच्या टीकेला फारसे महत्त्व द्यायची गरज नाही.’’

महाराज अजून दहा वर्ष जगले असते तर...

‘‘केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीत मला ‘छत्रपती शिवाजी महाराज अजून दहा वर्ष जगले असते तर काय झाले असते’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मी ‘महाराजांनी तेव्हाच दिल्ली काबीज केली असती आणि भारताचे सर्वोच्च सत्ताधीश म्हणून ते विराजमान झाले असते’, असे उत्तर दिले. इंग्रजांनीही मुघलांना पराजित करून नव्हे, तर मराठ्यांकडून देश काबीज केला’’, असे अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT