Sharad Pawar sakal
पुणे

Sharad Pawar : हुकूमशाहीच्या दिशेने चाललेले हे सरकार याला आत्ताच आवर घालण्याची वेळ

सासवड येथे महाविकास आघाडीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन .... सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळावर महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते. दोन वर्षांपासून नगरपालिका जिल्हा, परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

सासवड शहर : सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळावर महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते. दोन वर्षांपासून नगरपालिका जिल्हा, परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या नाहीत. याचा अर्थ येत्या काळात सरकार विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका होऊ देतील का याबद्दल शंका वाटते असा सवाल शरद पवार यांनी केला. हुकूमशाहीच्या दिशेने चाललेले हे सरकार याला आत्ताच आवर घालण्याची वेळ आहे. लोकशाहीच्या भवितव्यासाठी लढा देण्याची गरज आहे असे पवारांनी सांगितलं.

कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या जात आहेत. धमक्या न देता निवडणूक लढवून दाखवा काही लोकांना धमक्या येत आहेत. पण त्यांना सांगा धमक्या देणे हा आमचा धंदा आहे असे सांगून राऊत पुढे म्हणाले, मोदी सरकार महाराष्ट्रला घाबरत आहेत. त्यामुळे मोदी व अमित शहा अनेक वेळा महाराष्ट्रात येत आहेत

यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, आमदार अशोक पवार, आमदार संजय जगताप, संभाजी झेंडे, माणिक झेंडे पाटील, प्रदीप पोमण, अभिजीत जगताप, दत्ता कड, श्याम माने, गौरी कुंजीर, भारती शेवाळे, सुदाम इंगळे, बंडूकाका जगताप, शंकर हरपळे, विजयराव कोलते, विकास लवांडे, पुष्कराज जाधव, राहुल गिरमे, शिवाजी कोलते, अंकुश काकडे, बाळासाहेब भिंताडे, लक्ष्मण माने, अमोल कामथे, उपस्थित होते.

माझ्या आजीने मला रडायला नाही लढायला शिकविले आहे. महाविकास आघाडीच्या कोणत्याही मानसाला काही झाले तर तर ते खपुन घेतले जाणार नाही. राज्यात आम्ही उठाव केल्याशिवाय राहणार नाही. गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे कारण "मलिदा गॅंग" येथून गेल्यामुळे गर्दी आज वाढली आहे. असे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

पुरंदर मधून ५० हजारा पेक्षा अधिक मताधिक्य आम्ही देणार आहोत. गुंजवणी, सासवड, जेजुरी, उरुळी या पाणी योजना या सरकारने घडविल्या असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले. २००५ पासून विमानतळाचा विषय सूरु आहे. पुरंदरमधील सात गावाच्या विमानतळ बाघीत लोकांचा प्रश्न होता. त्या वेळी पहिली बैठक पवार साहेबांच्या उपस्थित झाली असल्याचे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final : हे, बरोबर नाय...! Smriti Mandhana अम्पायरवर नाराज झाली, ऑस्ट्रेलियाची चतुराई की भारताचं दुर्भाग्य?

Jio offers: जिओ ग्राहकांना खुशखबर! 35 हजार रुपयांची मोफत सेवा मिळणार; सुरुवातीला 'याच' ग्राहकांना फायदा

Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन रुळांवर लवकरच धावणार, अखेर रेल्वेकडून मान्यता

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Latest Marathi News Live Update: बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु

SCROLL FOR NEXT