Bharati Vidyapeeth area Traffic
Bharati Vidyapeeth area Traffic sakal
पुणे

Bharati Vidyapeeth Traffic : भारती विद्यापीठ परिसराला वाहतूक कोंडीचा फास

अशोक गव्हाणे

कात्रज - भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. कात्रज डेअरी, राजमाता भुयारी मार्ग त्रिमूर्ती चौक परिसरात एकाच वेळी सुरु असलेल्या महापालिकेच्या कामांमुळे हा फटका बसत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून कामाला गती देण्याची मागणी होत आहे.

कात्रज चौकात उड्डाणपूलाच्या रस्त्यांसाठी काम सुरु असल्याने सातारा रस्त्यांवरून नवले पुलाकडे जाणारी वाहने सरहद चौकातून वळून मुंबई रस्त्यांवर निघतात. तसेच, दत्तनगर आंबेगाव भागात जाणारी वाहने राजमाता भुयारी मार्गातून जातात.

मात्र, आता राजमाता भुयारी मार्ग आणि राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या समोर काम सुरु असल्याने वाहनचालकांची अडचण होत आहे. त्यातच धनकडवडीतून त्रिमुर्ती चौकात येणारा रस्ता पाण्याची लाईन टाकण्यासाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत असून मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.

सरहद चौक, चंद्रभागा चौक, तिरंगा चौक, राजमाता भुयारी मार्ग, दत्तनगर-चौक, त्रिमुर्ती चौक, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या समोरील बाजू आदी ठिकाणी वाहतूककोंडीने फास आवळला आहे. सर्व ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा दिसून येतात. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. त्यातच भर म्हणून रस्त्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणांत चारचाकी आणि दुचाकी गाड्या पार्किंग केल्याचे दिसून येते, यावर पोलिसांनी कडक कारवाई करुन वाहतूक कोंडी फोडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

प्रतिक्रिया

एकाच वेळी तीन ठिकाणी कामे सुरु असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मात्र विकासकामांना अटकाव करता येत नाही. वाहतूक सुरळित करण्यासाठी महापालिकेकडून वॉर्डनची मागणी केली आहे. तसेच, रात्रीच्या वेळी मी स्वतः कर्मचाऱ्यांसह वाहतूक सुरळित करण्यासाठी उपस्थित राहून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेत आहे.

- विजय टिकोळे, पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ वाहतूक शाखा

सदरील कामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे कामाला गती देण्यात येईल. राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे काम पुढील १५ दिवसांत पूर्ण होईल. तर राजमाता भुयारी मार्गावर ड्रेनेज आणि पावसाळी लाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान दोन महिन्याचा कालावधी लागेल. पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.

- दिलीप पांडकर, उपअभियंता, पथविभाग, महापालिका

याठिकाणी होत असलेली वाहतूककोंडी हे नियोजनशून्य कारभाराचे उदाहरण आहे. एकाचवेळी अनेकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. नियोजनपूर्वक टप्प्याटप्याने काम हाती घेतले असते तर ही वेळ आली नसती आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले नसते.

- राजाराम वीर, स्थानिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT