BJP-&-Congress
BJP-&-Congress 
पुणे

भाजपवासीय नेते भेटले काँग्रेस आमदारांना

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने चर्चेचा विषय झाला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर त्यापैकी काहींनी पुन्हा काँग्रेसच्या आमदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या या भेटीने शहर काँग्रेसमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे. भाजपवासीय झालेल्या या नेत्यांनी केवळ अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेतली की अन्य कारणांसाठी, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.

आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या वाट्याला तीन मतदारसंघ आले होते. त्यापैकी पुणे कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघातील पक्षाचे आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवाराला थोड्या मतांनी पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे विजयी आणि पराभूत, अशा दोन्ही उमेदवारांकडून निकालानंतर विश्‍लेषण करताना पक्षबदल करण्याचा फायदा आणि तोट्यावर चर्चादेखील झाली.

निकाल लागल्यानंतर भाजपवासीय झालेल्या काही माजी नगरसेवकांनी आमदार विश्‍वजित कदम आणि आमदार संग्राम थोपटे यांची स्वतंत्र भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसवर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, भेट घेणाऱ्यांमध्ये शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपवासीय झालेले काही जण होते. निवडून आल्याबदल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात या भेटीत काय चर्चा झाली, यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र, निवडणुकीत ऐन वेळी पक्षबदल करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT