बंगालला वंग-भंगाच्या
दिशेने नेण्याचा प्रयत्न
भाजपचा तृणमूल कॉंग्रेस सरकारवर आरोप
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १७ : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा पश्चिम बंगालच्या विभाजनाचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप भाजपने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे घटनात्मक प्रक्रिया पायदळी तुडवली जात असून बंगालला वंग-भंगाच्या दिशेने नेले जात आहे, असाही हल्लाबोल भाजपने केला आहे.
भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते व खासदार संबित पात्रा यांनी व्यापक मतदार नोंदणी मोहिमेवरून (एसआयआर) सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसवर तोफ डागली. देशातील अनेक राज्यांत ही प्रक्रिया सुरळीतपणे राबवली जात असून २००३ मध्येही ती पार पडली होती आणि त्यावर संसदेतील चर्चा झाली होती. पश्चिम बंगालमध्ये मात्र ही घटनात्मक प्रक्रिया रोखण्यासाठी बेकायदा मार्गांचा आणि हिंसेचा वापर केला जात असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला. जादवपूर विधानसभा मतदारसंघातील बुथस्तरीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येचा संदर्भ देत संबित पात्रा म्हणाले, की निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारीही राज्यात सुरक्षित नाहीत. आत्महत्या केलेले अधिकारी अशोक दास घटनात्मक कर्तव्य बजावत असताना त्यांना तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून धमक्या देण्यात आल्या. घुसखोराचे नाव मतदारयादीतून वगळल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सांगितले गेले. या धमक्यांमुळे त्रासलेल्या अशोक दास यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पत्नीने तृणमूल कॉंग्रेसविरोधात गुन्हा नोंदवला आहे. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर बोलताना पात्रा यांनी बीडीओ कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला. हा हल्ला टीएमसी आमदार मनीरुल इस्लाम यांच्या उपस्थितीत झाल्याचा आरोप त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.