पुणे - उजवा मोठा कालवा फुटून शेकडो जणांचे संसार उद्ध्वस्त होऊनही कालवा फुटण्याची कारणे शोधण्यात महापालिका आणि पाटबंधारे खाते कमी पडले आहे. ही दुर्घटना घडून सव्वातीन महिने झाले तरी कालव्याची अवस्था, तो फुटण्याची कारणे आणि दुर्घटनाग्रस्त लोकांना मिळालेली मदत या बाबींचा अहवाल राज्य सरकारकडे पोचलेला नाही. त्यामुळे कालवा फुटीची घटना पाटबंधारे खात्याने व महापालिकेने फारशी गांभीर्याने घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातून वाहणारा उजवा मोठा कालवा फुटल्याने जनता वसाहत व दांडेकर पूल परिसरातील शेकडो घरांचे नुकसान झाले. कालवा फुटून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले. कालव्याला भगदाड पडल्याने तो फुटल्याचे कारण देण्यात आले. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, पाटबंधारे खाते आणि संबंधित यंत्रणेमधील अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि कालवा फुटण्याची कारणे शोधून त्याबाबतचा अहवाल १५ डिसेंबरपर्यंत देण्याची सूचना दिली होती. प्रत्यक्षात मात्र एखादी- दुसरीच बैठक घेऊन समितीचे कामकाज गुंडाळण्यात आले आणि त्यानंतर अहवाल पाठवण्याकडेही समितीचे दुर्लक्ष झाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.