पुणे

केंद्र सरकारचा अजब कारभार : अतिवृष्टीच्या दोन महिन्यानंतर केंद्रीय पथक बारामतीत

मिलिंद संगई

 बारामती : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आज तब्बल दोन महिने उलटून गेल्यावर केंद्रीय पथक बारामतीत आले होते. या पथकाच्या पाहणीबद्दल लोकांनी खिल्ली उडवत दोन महिन्यानंतर पथक कसली पाहणी करणार असा प्रश्न उपस्थित केला. 

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याला अखेर दोन महिन्यानंतर केंद्रीय पथकाला आज वेळ मिळाला. अतिवृष्टीने तालुक्यात पिकांसह शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र दोन महिन्यानंतरच्या या पाहणी दौ-याचा नेमका काय उपयोग, पथक कशाची पाहणी करणार आणि काय अहवाल देणार असाच प्रश्न लोकांनी उपस्थित केला. 

दोन महिन्यात सगळीच स्थिती पूर्ववत झालेली आहे, त्या मुळे त्या वेळेसची परिस्थिती काय होती हे या पथकला कसे समजणार, त्यांना नुकसानीचा अंदाज तरी कसा येणार असेही प्रश्न उपस्थित केले गेले. जी. रमेशकुमार आणि आर. बी. कौल यांचा केंद्रीय पथकात समावेश होता.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, तहसिलदार विजय पाटील, तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अधिकारी विश्वास ओहोळ यावेळी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कऱ्हावागज येथील कऱ्हा नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जळगाव कडेपठार येथील शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणी पथकाने केली. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील शेतीसह पिकांचे, घरांचे व पशुंचे मोठे नुकसान झाले आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT