Chandrakant Patil gives Statement about Reservation
Chandrakant Patil gives Statement about Reservation 
पुणे

फडणवीसांनी कष्टाने मिळवून दिलेले आरक्षण, या सरकारने टिकवलं नाही : चंद्रकांत पाटील

सकाळवृत्तसेवा

पुणे : ''तेरा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नको ती लोकं एकत्र आली. सर्वात जास्त आमदार निवडून येऊनही भाजप विरोधी पक्षात राहिली. त्या सरकारला आता एक वर्ष पूर्ण झाली. या एक वर्षात सामान्य माणूस पूर्णपणे भरडला गेला आहे. महिला अत्याचार, मराठा आरक्षण गोंधळ असा सर्व प्रकार या सरकारच्या काळात पहायला मिळाला.'' अशी टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास सरकारच्या कारभारवर केली. आघाडीच्या सरकाराची काल (ता.28) वर्षपुर्ती झाली. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होती.

कोरोनाचे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात
''कोरोनाचे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे. जगातले पाच देश सोडले तर सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. अशी गंभीर परिस्थिती कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात होती. या काळात आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती.'' अशी माहिती यावेळी बोलताना दिली.

कोरोना रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी
''कोरोनाच्या काळात सरकार अपयशी ठरले आहे''असे सांगत पाटील म्हणाले, टटया सरकारच्या काळात सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. कोणी म्हणत आज शाळा सुरू होईल, कोणी म्हणत होणार नाही. तोच गोंधळ आता दहावीच्या परिक्षेवरून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राची अवस्था वाईट झाली आहे.''

संजय राऊत हे खूप मोठे व्यक्तिमत्त्व 
यावेळी संजय राऊत यांच्याबद्द्ल विचारले असता ते म्हणाले, संजय राऊत खूप मोठे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याबद्दल मी अलीकडे बोलणे बंद केले आहे. ''सरकार येतील आणि जातील पण, महाराष्ट्र संतांनी सामाजिक एकतेची जी विन विणली होती त्याला धक्का लावण्याचे काम मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू आहे'', असेही ते म्हणाले. 

सरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे केले 
महाविकास आघाडीसरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे करून टाकले. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कष्टाने आरक्षण मिळवून दिले होते, पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आली नाही. शिक्षणातील आरक्षण यांनी आता रद्द केले. सरकार येतील आणि जातील पण, महाराष्ट्र संतांनी सामाजिक एकतेची जी विन विणली होती त्याला धक्का लावण्याचे काम मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT