wagholi
wagholi 
पुणे

पुणे : वाघोली ग्रामसभेत अभूतपूर्व गोंधळ

सकाळवृत्तसेवा

वाघोली (पुणे) : कचरा प्रश्नावर आयोजित वाघोलीच्या विशेष ग्रामसभेत संतुलन संस्थेने कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पलाच विरोध केल्याने अभूतपूर्व गोंधळ माजला. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

सध्या ज्या ठिकाणी कचरा डेपो आहे तेथे प्रकल्पाचे काम सुरू असल्याने तो प्रकल्प सुरू होई पर्यंत कचरा टाकायचा कोठे असा प्रश्न ग्रामपंचायती समोर उभा आहे. शासकीय खाणीत कचरा टाकण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला होता. मात्र काहीनी याला विरोध केला.अखेर यासाठी सोमवारी विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली. या ग्रामसभेत चर्चा सुरू असताना संतुलन संस्थेचे बस्तू रेगे यांनी कचरा प्रकल्पाला विरोध केला. गायरान जागा शासकीय मालकीची आहे. गावातील कचरा समस्यांवर मात करण्यासाठी प्रकल्प गरजेचा असून हा प्रकल्प होणारच असे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांनी स्पष्ट करताच संतुलनच्या कार्यकर्त्यांनी विरोधात घोषणा दिल्या. यामुळे नागरिक व सदस्य संतापले. त्यातूनच सभेत अभूतपूर्व गोंधळ माजला. माईक फेकण्याचा प्रकार ही घडला. पोलिसांनी हस्तक्षेप करून गोंधळ थांबविला.

यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य संजय सातव यांनी प्रकल्प होई पर्यंत तेथेच प्रकल्प जवळ कचरा टाकावा. 32 टन क्षमतेचे दोन कचरा प्रकल्प उभारावे. सध्या सर्व कचऱ्याचे कंटेनर काढून घ्यावेत. असे मुद्दे मांडले. त्याला सर्व जणांनी संमती दर्शविल्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला. सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या प्रसंगी उपसरपंच संदीप सातव, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT