supriya sule  sakal
पुणे

Supriya Sule : मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करावे

बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला आहे.

मिलिंद संगई

बारामती - बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तरी तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

खासदार सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून मुख्यमंत्री तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही त्यांनी टॅग केले आहे.

दुष्काळी आढावा बैठकीत पिण्याचे तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने या बैठकीचे आयोजन करावे, असे त्यांनी नमूद केले आहे.

काही तालुक्यात दुष्काळ जाहिर झालेला असला तरी अनेक ठिकाणी आणखी काही उपाययोजना करण्याची गरज असून या बाबत सरकारी स्तरावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक होऊन उपाययोजना व्हाव्यात अशी सुप्रिया सुळे यांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाइट अन् लिंक व्हायरल; वेळीच सावध व्हा, नाहीतर बसेल मोठा फटका

Sunday Evening Snack: संध्याकाळच्या भूकेची करा अशी सोय, चहासोबत तयार करा लेफ्टओव्हर पोळीच्या बाकरवडी

Madhuri Elephant Return : महादेवी हत्तीण महाराष्ट्रात परत येणार? खासदारांनी कोल्हापूरकरांना दिली मोठी खुशखबर

Crime: 'फ्रेंडशिप डे'लाच मैत्रीच्या नात्याला काळिमा! मान दाबली, मांडीवर सिगारेटचे चटके अन्...; तरुणाचं मुलीसोबत संतापजनक कृत्य

धक्कादायक! 'ऊस देऊन आठ महिने उलटले तरी दमडी नाही'; जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतरही आडमुठेपणा, मुलांची शिक्षणे थांबली

SCROLL FOR NEXT