बापट  sakal
पुणे

पुण्यातील नदी संवर्धन प्रकल्प तातडीने पुर्ण करा : बापट

पुण्यातील नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यांमुळे जलजन्य आजारांचाही धोका आहे.

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : पुण्यातील (Pune) मुळा-मुठा (mula mutha) नद्या या सर्वाधिक प्रदूषित आहेत. त्यांच्या स्वच्छतेसाठी मंजूर केलेला प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. नद्यांमधील प्रदूषित पाण्यामुळे पुणेकरांच्या (pune) आरोग्याला धोका आहे. त्यामुळे नदी संवर्धन प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी खासदार आणि संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष गिरीश बापट (girish Bapat) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन प्रदूषित नद्यांच्या समस्येकडे त्यांनी लक्ष वेधले. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्राने तातडीने पावले उचलण्याची मागणी त्यांनी शेखावत यांच्याकडे केली आहे.

बापट म्हणाले, "पुण्यातील मुळा-मुठा नदी सर्वात प्रदूषित नद्यांपैकी आहे. नदीत टाकलेले सांडपाणी आणि औद्योगिक प्रदूषकांचे प्रमाण त्याला कारणीभूत आहे. निवासी भागात कचरा विलगीकरण होत नाही. तसेच उद्योगांमध्ये तयार होणारे प्रदूषित पाणी नदीत सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया किंवा ते फिल्टर केले जात नाही. त्याचा सागरी जीवाला गंभीर धोका निर्माण होतो आहे. पाण्याचा रंगही निळा न राहता, काळसर राखाडी झाला आहे."

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या नद्यांना उच्च धोका श्रेणीत म्हणजेच प्राधान्य 1 म्हणून वर्गीकृत केले आहे. पुण्यातील नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यांमुळे जलजन्य आजारांचाही धोका आहे. पुणे महानगरपालिकेद्वारे प्रक्रिया न केलेले 125 एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) सांडपाणी नदीत सोडले जाते. परिणामी, प्रदूषणाची पातळी वाढल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याच्या गुणवत्तेचे वर्गीकरण चतुर्थ श्रेणीमध्ये केले आहे, असे याकडे बापट यांनी लक्ष वेधले.

मुळा-मुठा नदीच्या स्वच्छतेसाठी एक प्रकल्प 2016 मध्ये मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत हा मंजूर प्रकल्प केंद्र सरकारने 2022 मध्ये पूर्ण करणे नियोजित आहे. केंद्र सरकार आणि पुणे महापालिका यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. मात्र, आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असे स्पष्ट करीत त्या प्रकल्पाला वेग द्यावा आणि तो लवकर पूर्ण करावा, असे बापट म्हणाले.

नदी संवर्धन प्रकल्प हा प्रदूषणाशी संबंधित आहे. त्याचा पुण्याच्या प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. म्हणून हा प्रकल्प जलद गतीने राबवावा. जेणेकरून तो प्राधान्याने पूर्ण होईल. तसेच पुणे शहराचे स्वच्छ नदीचे स्वप्नही लवकर पूर्ण होईल, अशी विनंती बापट यांनी केंद्रीय मंत्री शेखावत यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

Central Railway: सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे ब्रेक अचानक निकामी, उतारावर नियंत्रण सुटलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT