मार्केट यार्ड : केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिलेली आहे. याला मार्केट यार्डातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीमधे मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. मंगळवारी मार्केट यार्डात शेतमालाची फक्त दहा टक्केच आवक झाली.
इतर दिवशी मार्केट यार्डात दररोज किमान ८००-९०० गाड्यांमधून बाजार समितीतील फळं आणि भाजीपाल्याची आवक होत असते. परंतु आज फक्त १५०-१७५ गाड्यांची अवाक झाली होती. त्यामुळे बाजारात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला. बाजारात दररोजच्या पेक्षा ५ टक्केच ग्राहक, व्यापारी उपस्थित होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बाजार समितीतील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ शेतकरी बंदच्या समर्थनार्थ बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला.हमाल ही सहभागी झाले असल्याने मार्केट मध्ये शांतता दिसत आहे. मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत, महात्मा फुले कामगार संघटना, मार्केटयार्ड टेम्पो संघटना, महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन या सर्व संघटनांनी शेतकऱ्यांचा बंदला पाठींबा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.