पुणे

देशातील घडामोडींवर अभ्यासकांनी व्यक्त होण्याची गरज

CD

कोथरूड,  ता.‌ १० :  ‘‘घटना दुरुस्ती विधेयकावरून देशभरात चर्चा सुरू आहे.  पुण्यात १५ विधी महाविद्यालये आहेत. त्यामध्ये ४५ हून अधिक प्राध्यापक संविधान शिकवणारे आहेत, पण ही मंडळी समाजात व्यक्त होताना दिसत नाहीत. संविधान काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कर्तव्य आहे,’’ असे मत घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

कोथरूडमधील गांधी भवन येथे रविवारी ३१   वे गांधी दर्शन शिबिर पार पडले,  या वेळी पहिल्या सत्रात  ‘महिला आरक्षण,  डिलिमिटेशन विधेयक आणि घटनादुरुस्ती’ या विषयावर  घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट   यांनी आपले विचार मांडले. या वेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. प्रवीण सप्तर्षी उपस्थित होते.

दुसऱ्या सत्रात ‘अस्थिर जग आणि आपण’  या विषयावर  ज्येष्ठ पत्रकार  जतीन देसाई यांनी मांडणी केली.  या सत्राचे अध्यक्ष अन्वर राजन होते. तिसऱ्या सत्रात  अनंत महादेवन  दिग्दर्शित  ‘फुले’ हा   चित्रपट दाखवण्यात आला.   कार्यक्रमाचे संयोजन   महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी केले.

प्रा. बापट म्हणाले की,  संसदेचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. मात्र, आपल्याकडे  नवीन संसद इमारतीचे उद्घाटन झाले त्यावेळी त्यानांच बोलावले नाही.  अनेक वर्षांपासून संसदेला उपसभापती नाहीत.

-----------------
युद्ध सुरू करणे सोपे; संपवणे अवघड
जतीन देसाई म्हणाले की,   रशिया- युक्रेन युद्ध चार वर्षे सुरू आहे. रशियाचे साडेतीन ते पाच लाख जवान मारले गेले आहेत. आता अमेरिका, इस्रायलचे इराण विरोधात युद्ध सुरू आहे. युद्धामुळे लहान राष्ट्रेसुद्धा अणुबॉम्ब बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे अधिक धोकादायक आहे. युद्ध ज्वर परवडणारा नाही. युद्ध सुरू करणे सोपे, संपवणे अवघड असते. हल्ला करणाऱ्या राष्ट्राला आपण जिंकलो हे दाखवावे लागते.  ज्यांच्या सांगण्यावरून लोक थांबतील, असे जागतिक नेतृत्व नाही. युनोसुद्धा नाही, मात्र, महात्मा गांधी तसे नेतृत्व होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT