Army Sakal
पुणे

देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या पत्नींचे योगदान विसरण्यासारखे नाही.

‘प्रत्येक व्यक्ती आज देशात सुरक्षितपणे वावरत आहे. याचे श्रेय जाते ते देशाच्या सैनिकांना.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘देशाच्या सुरक्षेसाठी (Country Security) आपल्या सैनिकांचा (Army) सिंहाचा वाटा असतो. देशासाठी शहीद होणाऱ्या या वीरांच्या पत्नींचे योगदान ही विसरण्यासारखे नाही.’ असे प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला सशक्तीकरणावर आधारित व सैनिकी कुटुंबाला समर्पित करण्यासाठी लेखक व दिग्दर्शक पंकज सतीश साठे यांच्या ‘वाट तुझ्या पावलांची’ या गाण्याचे अनावरण मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सोल्जर इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या सुमेधा चिथडे, वीरपत्नी शीतल जगदाळे , कुंदना आगवण, जयश्री शेळके, अजिता बागडे, सोनाली फराटे आदी उपस्थित होत्या. यावेळी सर्व वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.

मोहोळ म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्ती आज देशात सुरक्षितपणे वावरत आहे. याचे श्रेय जाते ते देशाच्या सैनिकांना. देशासाठी जबाबदारी पार पाडत असताना प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहिदांच्या पत्नी देखील त्यांच्या मागे आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडतात. अर्धांगिनी म्हणून वेगळीच लढाई लढणाऱ्या वीरपत्नींची भूमिका या गाण्यातून पुढे आली आहे.’

चिथडे म्हणाल्या, ‘आजही कित्येक वीर पत्नींना संघर्ष करावा लागतो. जवान शहीद झाल्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेणे हे समाज म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.’

देशासाठी केवळ सैनिकांचाच नाही तर त्यांच्या कुटुंबाचा ही त्याग असतो. याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाने लक्षात ठेवावी आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी. यासाठीच हे गाणे शहीद झालेल्या प्रत्येक जवान बांधवाला अर्पण केले आहे. असे यावेळी साठे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Red Alert : मुंबईला पावसाचा तडाखा! कांदिवली, मालाडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' जारी, पुढील 3 तास महत्त्वाचे

Maharashtra Government Decision : मोठा निर्णय! राज्यातील २९ जिल्ह्यांत नवीन अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालये होणार; सामान्यांचा वेळ, पैसा, त्रास वाचणार

Latest Marathi News Live Update : भर पावसात वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण

Chhatrapati Sambhajinagar: अनेक मंत्र्यांशी संबंध, अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी लावतो; तरुणाला २१ लाखांना गंडा

Mumbai Rain: पहिल्याच पावसाने मुंबईची पोलखोल! वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली; नेमकं कुठे आणि काय घडलं?

SCROLL FOR NEXT