पुणे

पुरातत्व विभागाच्या आदेशाला केराची टोपली; पर्यटक राहताहेत किल्ल्यांवर मुक्कामी

मनोज कुंभार

राज्य संरक्षित स्मारकांवर कोणालाही मुक्काम करता येणार नसल्याचे पुरातत्व विभागाकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

वेल्हे (पुणे) - राज्य संरक्षित स्मारकांवर कोणालाही मुक्काम करता येणार नसल्याचे पुरातत्व विभागाकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र तरीसुद्धा अनेक पर्यटक किल्ले राजगड व किल्ले तोरणावर मुक्कामी राहत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे पर्यटक आणि काही उपद्रवी पर्यटकांमुळे किल्ल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र त्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा पुरातत्व खात्याकडे उपलब्ध नाही.

नियमानुसार रात्रीच्या वेळी गड-किल्ल्यांवर मुक्काम करण्यास मनाई आहे. पुरातत्व विभागाने तसे स्पष्ट केले असून तसे लेखी निर्देशही दिले आहेत. मात्र त्यास न जुमानता एका दिवसांत गड पाहणे शक्य होत नसल्याचे कारण देत किल्ल्यांवर मुक्कामी जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये लहान मुले,महिला यांचे प्रमाणही दिवसेंनदिवस वाढत चालले आहे.या प्रकारामुळे पर्यटकांची आणि पर्यायाने गड-किल्ल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रात्री मुक्कामी राहणाऱ्या पर्यटकांमधील काही उपद्रवी पर्यटकांमुळे किल्ल्यांवरील अवशेषांचे नुकसान होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. मागील वर्षी तोरणा गडावरील तटबंदीच्या संवर्धन कार्याची काही उपद्रवी पर्यटकांनी पाडापाड केली होती. त्यानंतर पुन्हा किल्ल्यांवर मुक्कामी राहता येणार नसल्याचे निर्देश पुरातत्व खात्याकडून देण्यात आले होते. तरीसुद्धा शेकडो पर्यटक हे किल्ले राजगडावर व तोरण्यावर मुक्कामी असल्याचे दिसून येत आहे.

गडांवर जाण्यासाठी अनेक वाटा असल्याने तसेच पुरातत्त्व विभाग आणि वनविभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने सरसकट सगळ्या वाटांवर लक्ष ठेवणे कठीण आहे. गडभ्रमंती साठी जाणाऱ्या हौशे नवशे गवशे यांचे प्रमाण अधिक वाढल्याने गडांवरील अपघात आणि उपद्रव या घटना वाढल्याचे चित्र काही वर्षात किल्ले राजगड व तोरण्यावर आढळून येत आहे.

'रात्रीच्या वेळी गडावर मुक्कामी राहण्यास प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक नागरीक, वनविभाग व प्रशासनाने पुढे येणे गरजेचे आहे. तसेच पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून विकास आराखड्यामध्ये या मुद्द्यासाठी तरतूद होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल.'

- विलास वाहने, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग

'पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार सायंकाळच्या वेळेस किल्ल्यावरील पर्यटकांना किल्ल्यावरून खाली जाण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु काही अतिउत्साही पर्यटकांकडून आम्हालाच दमदाटी केली जाते. त्यासाठी किल्ल्यावर पोलिसांची आवश्यकता आहे.'

- बापू साबळे, पुरातत्व विभाग कर्मचारी, किल्ले राजगड

किल्ले तोरणा व राजगड नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व किल्ले गटकोटांनवर रात्रीस मुक्कामांस बंदी निर्णयाची कठोर अंमलबजावणी पुरातत्व विभागाकडुन व्हावी .

- महेश कदम, संस्थापक अध्यक्ष शिवशंभु प्रतिष्ठान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT