Students_Diploma 
पुणे

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला तरीही दहावी-बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाला मुहूर्त सापडलेला नाही. हे प्रवेश कधी सुरू होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

बारावीचा निकाल १६ जुलै तर दहावीचा निकाल २९ जुलैला जाहीर झाला. १२वीच्या निकालास तर दोन पेक्षा जास्त आठवडे उलटून गेले तरी फार्मसी, हॉटेल मॅनेजेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी आणि सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली नाही. दहावी निकालनंतर तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्‍निक) प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र अजूनही याचे वेळापत्रक प्रतिक्षेत आहे.

दरम्यान, तंत्रशिक्षण विभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकियेस उशीर होत आहे, हे मान्य केले असले, तरी आणखी दोन ते तीन दिवस यासाठी लागू शकतील असे सांगितले. 

तंत्रशिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश नियमावलीत बदल केला आहे. यामध्ये दोन प्रवेश फेऱ्या होणार आहेत. डिफेन्सच्या राखीव जागांचे प्रमाण ५ जागा वरुन ५ टक्के जागा राखीव केल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यात बनवा 'हे' चविष्ट हलवा, बाप्पा प्रसन्न होतील

Vijay Wadettiwar: सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार; 'ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभा केल्याचा आरोप'

Latest Maharashtra News Updates : अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण तूर्त स्थगित, मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर निर्णय

पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या १५०२४ पैकी ५०० बेघर लाभार्थीच गेले घरकुलात रहायला! देशातील सर्वात मोठ्या ‘रे नगर’ गृहप्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ९००० घरे तयार

SCROLL FOR NEXT